उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रणनवरेंचे उपोषण मागे

05 Dec 2023 16:30:25
जालना,
 
brahmin-reservation ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ व इतर मागण्यांसाठी दीपक रणनवरे जालना येथे गेले आठ दिवस उपोषणास बसलेले होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार रणनवरे यांनी व्यक्त केला होता. brahmin-reservation राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जिल्ह्यातील विविध आमदार यांनी रणनवरेची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. brahmin-reservation परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठोस आश्वासन आल्याशिवाय उपोषण परत घेणार नाही, असा पवित्रा रणनवरे यांनी घेतला होता.
 
 
brahmin-reservation
 
brahmin-reservation या पार्श्वभूमीवर काल सोमवार ४ डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक रणनवरे यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला व संबंधित विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या सहीचे पत्र आज जिल्हाधिकारी जालना व पोलीस अधीक्षक जालना यांनी प्रत्यक्ष आणून दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते फळांचा रस घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले. brahmin-reservation शासनाने रणनवरे यांना दिलेल्या पत्रात दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक लावल्याचे कळवले आहे. brahmin-reservation
 
 
 
आंदोलनाचे मुख्य समन्वयक व उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. brahmin-reservation परंतु मागण्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास अजून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील सरकारला दिला. त्यासोबतच गेले आठ दिवस या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजघटक तसेच इतर समाजाचे नेते संघटना यांचे त्यांनी आभार मानले. brahmin-reservation यावेळी राज्यसमन्वयक दिपक रणनवरे, विजया कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ईश्वर दीक्षित, विश्वजीत देशपांडे, सुरेश कुलकर्णी, बलवंत नाईक, मकरंद कुलकर्णी आणि संजय देशपांडे यांच्यासह मोठया प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0