तभा वृत्तसेवा
मारेगाव,
Cloudy weather : तालुक्यात 5 हजार 297 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली असून तूर बहरली आहे. परंतु काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पाऊस पडत असल्याने याचा परिणाम थेट कापूस, तूर, गहू, चणा या पिकांवर जाणवायला लागला आहे. किडींचासुद्धा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता दिसत आहे. सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकर्यावर नेहमीच संकटाची टांगली तलवार असते.
वातावरणातील बदल जर कोणाला जाणवत असेल तर तो सर्वात आधी Cloudy weather शेतातील पिकांवर जाणवतो. अशीच परिस्थिती आज सर्वच उभ्या पिकांवर येऊन ठाकली आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचा मोठा फटका शेतकर्याला बसणार असल्याचे दिसत असून त्यामुळे मात्र उभे पीक पुन्हा हातून जाणार ही भीती शेतकर्यांना सतावत आहे. अशा वातावरणामुळे निर्माण झालेली कीड हा मोठा प्रश्न आहे. तर गळणारी फुले व कीड यावर कोणताही उपाय नसल्याने या समस्येला सामोरे जायचे कसे, पीक कसे वाचवावे, याकरिता जगाच्या पोशिंद्याची धावपळ सुरू आहे.
मारेगाव तालुक्यात 44 हजार 424 हेक्टर कृषी क्षेत्र आहे. त्यात 5 हजार 297 हेक्टरवर तूर असून Cloudy weather ढगाळ वातावरणाने चांगलाच विपरित परिणाम होत आहे. तालुक्यातील तूर पिकावर शेंगा पोखणार्या पिसारा पतंग आणि शेंगे माशीनी आक‘मण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून संकटांची मालिका शेतकर्यांची पाठ सोडत नसल्याने कपाशी, सोयाबीन व आता तूर हातची जाणार आणि परत एकदा आर्थिक फटका बसणार असे जाणवत आहे.