राज्यावर 7 लाख कोटींचे कर्ज

-शेतकर्‍यांकडून वसूल करणार
-मग शेतकरी प्रश्नांवर चर्चा का नाही
-विधानसभेत नाना पटोले यांचा संतप्त सवाल

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
नागपूर,
Nana Patole : राज्यातील शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. मात्र, राज्य सरकारची शेतकर्‍यांविषयी भूमिका वेळकाढूपणाची आहे. शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी अवयव विकण्याची परवानगी द्यावी म्हणून मंत्रालयात येत आहेत. आज आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही, तर आणखी शेतकरी आत्महत्या करतील, त्याला आपण सर्व जबाबदार राहू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी आज विधानसभेत सांगितले.
 
Nana Patole
 
शेतकर्‍यांना भरपूर दिले म्हणून सरकार सांगत आहे. परंतु, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना काहीच मिळत नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा होऊ का देत नाही? सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर आम्हाला चर्चेत रस नाही. राज्यावर 7 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले, ते शेतकर्‍यांकडूनच वसूल करणार आहात ना, मग शेतकर्‍यांना पैसे देण्यास टाळाटाळ का, असा संतप्त सवाल नाना पटोले Nana Patole यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.
 
चर्चा करायला आलो, गोंधळ घालायला नाही
विधानसभेतील चर्चेत शेतकर्‍यांचे प्रश्न उपस्थित करीत नाना पटोले Nana Patole म्हणाले की, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सभागृहात आजच चर्चा केली पाहिजे. आम्ही शेतकरी, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथे आलो आहोत, गोंधळ घालायला आलेलो नाही. आम्हाला गोंधळ घालून कामकाज बंद पाडता आले असते पण आम्हाला चर्चा करायची आहे. कापूस, धान, संत्रा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, दूध उत्पादक शेतकरी कोणीच समाधानी नाही, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर आजच चर्चा करा. सरकार चर्चा करण्यास तयार आहे, आम्ही तयार आहोत तर मग वेळ कशाला? सरकारने पावसाळी अधिवेशनात 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर केल्या. आता पुन्हा 56 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या आहेत. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधी पक्षाचे आमदार या राज्यातील नाहीत का? आम्ही बाहेरच्या राज्यातून आलो आहोत का, असे प्रश्नही पटोले Nana Patole यांनी उपस्थित केले.