लोकांनी स्थैर्यासाठी मतदान केले : पंतप्रधान

उत्तराखंड जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे उद्घाटन

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
डेहराडून, ८ डिसेंबर
voted for stability उत्तराखंड हे गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण आहे. अलिकडच्या निवडणुकांमध्ये लोकांनी स्थिर आणि मजबूत सरकारांना मतदान voted for stability केले आहे. विकास करणाऱ्या भारताला अस्थिरता नको आहे. आज त्याला स्थिर सरकार हवे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
 
 
stability
 
voted for stability नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बहुमत प्राप्त केले आहे. येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय उत्तराखंड जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते व्यावसायिक नेत्यांना संबोधित करीत होते. यावेळी पंतप्रधानांनी देशाची शक्ती, कमकुवतपणा आणि धोके ओळखण्याची सूचना केली. ते म्हणाले, आम्हाला सर्वत्र आकांक्षा, आशा, आत्मविश्वास, नावीन्य आणि संधी दिसत आहेत. तुम्हाला धोरण-आधारित शासन दिसेल. voted for stability राजकीय स्थैर्यासाठी देशातील जनतेचा दृढ संकल्प तुम्हाला दिसेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आणि गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये ही परंपरा दिसली होती. लोकांनी सुशासनासाठी मागील सरकारचे काम पाहून मतदान केले.
 
voted for stability आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील संकल्पाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय कंपन्यांसाठी, भारतातील गुंतवणूकदारांसाठी ही आदर्श वेळ आहे. भारत काही वर्षांत जगातील तिसरी-मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात हे घडणे निश्चितच आहे. त्यांनी व्यावसायिकांना उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या विकासाच्या प्रवासात भागीदारी करण्यास सांगितले. त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिले. निर्यात वाढवण्याबरोबरच आम्हाला आमच्या आयातीत कपात करावी लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.