बोर्डाचा हलगर्जीपणा ... बारावीच्या प्रश्नपत्रिकेत मोठी चूक !

hsc board examविद्यार्थ्यांना मिळायला हवे सहा गुण

    दिनांक :21-Feb-2023
Total Views |
नागपूर,
 
hsc board exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. hsc board exam पण, मोठाच गाजावाजा करून आणि कडक बंदोबस्तात परीक्षा घेण्याचा दावा करणा-या मंडळाची पहिल्याच दिवशी ‘पोलखोल' झाली आहे. hsc board exam आज झालेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन गंभीर चुका आढळून आल्या आहेत.
 
 
 
barawi
 
 
hsc board exam या तीन प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण होते. पण, प्रश्नात नेमके काय विचारले आहे? हे रहस्य कायम आहे. विद्याथ्र्यांना बोर्डाच्या मनातले कळलेच नाही. ब-याच विद्यार्थ्यांनी हे तीन प्रश्न सोडून देण्यातच धन्यता मानली. hsc board exam विशेष म्हणजे, हे प्रश्न मुळात ‘प्रश्न' नसून, आदर्श उत्तरपत्रिकेतील उत्तरे आहेत, असा खुलासा नंतर झाला. पण, या प्रकारामुळे शिक्षण मंडळ बारावीच्या परीक्षेप्रती किती गंभीर आहे, हेदेखील चव्हाट्यावर आले आहे. hsc board exam वर्षभर अभ्यास करून, तणावाच्या वातावरणात विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचले.
 
 
प्रश्नपत्रिका पाहिल्यावर ते आणखीच गोंधळले कारण, या प्रश्नांना काहीही अर्थ नव्हता. hsc board exam ए३ क्रमांकाच्या प्रश्नात, योग्य उत्तराची निवड करा, असे सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठी पर्याय वगैरे देण्यात आलेले नाहीत. योग्य उत्तराची निवड कशी आणि कुठून करायची? हाच खरा प्रश्न आहे. hsc board exam तर, ए४ या प्रश्नात ‘पोएटीक डिव्हाईसेस'संकल्पनेविषयी माहिती देऊन, योग्य क्रम अर्थात उत्तरच देण्यात आले आहे. 
 
 
hsc board exam ए५ या प्रश्नात ‘कंपोझिंग लाईन्स'विषयी विचारण्यात आले असून, योग्य उत्तराची निवड करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठीही पर्याय वगैरे देण्यात आलेले नाहीत, हे विशेष! hsc board exam या प्रश्नांचे सहा गुण आता विद्यार्थ्यांना मिळायला हवेत, अशी मागणी आहे. शिक्षण मंडळाच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने पालकांना भोगावा लागतो आहे, हे मात्र खरे! hsc board exam याबाबत राज्य शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

परीक्षेत अनुचित प्रकार नाही : चिंतामण वंजारी
यंदा जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथक, बैठे पथक गठीत केले आहे. त्यामुळे बारावीच्या पहिल्या पेरपच्या दिवशी कुठेच अनुचित प्रकार झालेला नाही. परीक्षा अगदी शांततेत झाल्याचे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले.