नागपूर,
Sanskrit Literature संपूर्ण संस्कृत साहित्य आणि वाङ्मय हे पंचमहाभूतांनी व्यापलेले आहे. या साहित्याच्या बहुतांश कलाकृतीत सत्तर टक्के निसर्गाची आणि पर्यावरणाची विविध रूपे बघायला मिळतात. Sanskrit Literature ज्या ज्या ठिकाणी कालिदास आहे, त्या-त्या ठिकाणी निसर्गाचे विलोभनीय दर्शन अभ्यासकांना होते. कालिदासाचे मेघदूत तर मेघ, वारा, अंधार, उजेड, सावली, वृक्षांवरून होणारा विहार, आकाशातला मार्ग यावरच आधारित असून या निसर्ग सृष्टीने सर्वांनाच भुरळ घातलेली आहे, असे प्रतिपादन रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी येथे केले. Sanskrit Literature राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर संस्कृत विभागातर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

Sanskrit Literature संस्कृत वाङ्मयातील वर्णित निसर्गसृष्टी आणि पर्यावरण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी भूषविले. Sanskrit Literature याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. नंदा पुरी आणि संस्कृत विदुषी व लेखिका डॉ. विमल पवनीकर यांची विशेष उपस्थिती होती. संस्कृत विभागप्रमुख डॉ. शुचिता दलाल यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. Sanskrit Literature डॉ. संजय दुधे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे समयोचित भाषण झाले.
या कार्यक्रमात एकूण तीन सत्रे झालीत. Sanskrit Literature विविध सत्रांत विजया जोशी, प्रतिभा परेतकर, डॉ. मृदुला नासेरी, डॉ. सुषमा तिवारी, डॉ. शारदा गाडगे यांनी अध्यक्षपद भूषविले, तर ऑन लाईन माध्यमातून उज्जैन येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचे डॉ. गोविंद गंधे यांचे बीजभाषण झाले. Sanskrit Literature कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैभव, जया मुनघाटे, सूरज, शिवानी, अंजली, रोहिणी, अश्विनी यांचे सहकार्य लाभले. Sanskrit Literature सूत्रसंचालन विनया बोधनकर आणि वैशाली गौरशेट्टीवार यांनी, तर आभारप्रदर्शन मोहिनी जोशी आणि डॉ. तनुजा वाघमारे यांनी केले.
सौजन्य : श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र