मुंबई,
चित्रपट अभिनेता आणि लेखक (Ashutosh Rana) आशुतोष राणा यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे "अखिल भारतीय सन्मान" आणि "जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'रामराज्य' (Ram Rajya) आणि 'मौन मुस्कान की मार' या कादंबऱ्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी हा पुरस्कार आणि सन्मान देण्यात आला आहे.
हिंदी चित्रपटांतील दुश्मन, संघर्ष यासह डझनभर चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा (Ashutosh Rana) अभिनेता आशुतोष राणा आता विचारवंत आणि लेखक झाला आहे. त्यांनी (Ram Rajya) 'रामराज्य' आणि 'मौन मुस्कान की मार' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये त्यांना रामराज्य या कार्यासाठी यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता आशुतोष राणा यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या 'अखिल भारतीय सन्मान' आणि 'जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या 'अखिल भारतीय सन्मान' आणि जीवन गौरव पुरस्काराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, गुरुदेव दादाजींच्या कृपेने (Ram Rajya) रामराज्यासाठी मध्य प्रदेश अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार खूप पूर्वी मिळाला होता आणि आता अखिल भारतीय सन्मान आणि जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिला आहे.