मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

- खा. हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :29-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
उमरखेड, 
Painganga river : खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कर्तव्य दक्ष मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुंबई येथे भेट घेऊन पैनगंगा नदीस तीसरा कालवा घोषीत करावा आणि जेव्हा कालव्यात पाणी सोडले जाईल तेव्हा नदिपात्रात पाण्याचा विसर्ग करावा, अशी बैठकीत मागणी केली होती. खासदार हेमंत पाटील यांनी केलेली मागणी आणि उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचे आदेश दिले.
 
Painganga river
 
इसापूर धरण उशाला असताना देखील उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांसह कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील जनतेला उन्हाळा सुरु होताच शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत होती. या सात तालुक्यातील जनतेने खासदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन उन्हाळ्यात शेती आणि गुरुढोरांना पिण्याचे पाणी मिळावे अशी त्यांच्याकडे मागणी केली होती.
 
 
जनतेची मागणी थेट मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडुन नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही भटकंती करावी लागू नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावे अशी मागणी केली होती. त्यानंतर उन्हाळ्यात किमान दोन पाणी पाळ्या सोडण्यात येतील असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी सांगितले होते. मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. हेमंत पाटील त्यांच्या मागणीचा दखल घेत इसापूर धरणाखाली असलेल्या तालुक्यांच्या नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे नेहमी उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार्‍या उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांसह कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील नद्यांना आता उन्हाळ्यात देखील भरपुर पाणी सोडले जाणार आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ तीन जिल्ह्यात विभागला गेलेला सर्वात मोठा मतदार संघ आहे. इसापूर धरणाच्या खाली येणार्‍या हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेकडो गावांना आजही उन्हाळा आला की पाण्यासाठी भटकंती करावी गालते. शेतकरी आणि सामान्य जनतेची पाण्यासाठी होणारी भटकंती कायमची थांबली पाहिजे यासाठी मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलुन इसापूर धरणाच्या खाली येणार्‍या गावांच्या पाण्याच प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष पाण्यासाठी भटकंती करणार्‍या सात तालुक्यातील जनतेला कायमचा दिलासा मिळाला आहे. : खा. हेमंत पाटील