मुंबई,
बुलडाणा व जालना जिल्ह्यासाठी Railway Line बहु प्रतिक्षित आणि विदर्भ मराठवाड्याची भाग्यरेषा ठरणाऱ्या खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने भरावयाच्या हिश्याच्या रकमेची तरतूद केल्याने गत तीन वर्षापासुन सुरु असलेल्या आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नाना यश आले आहे. तसेच खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी काल सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुत्तरित प्रश्नांना उत्तर मिळाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील झुकझुक आगीनगाडीच्या प्रवास आता कूठे सुरू झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .
दि ९ मार्च २०२३ ला उपमुख्य मंत्री तथा वित्त मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधान सभेत सन २०२३- २४ चा अर्थ संकल्प सादर केला. या सादर केलेल्या अर्थ संकल्पात त्यांनी खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्याची भरावयाच्या रकमेची तरतूद केल्याची आपल्या भाषणात उल्लेख केल्याने खामगांव जालना रेल्वे मार्गातील राज्याच्या सर्व अडचणी आता दुर झाल्या आहेत. २०१६ च्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वातील तब्बल ११५ वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वेमार्गाला २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पपात सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली यासाठी ३००० कोटी रुपयांची तरतूद ही केल्याने खामगाव जालना रेल्वे मार्ग होण्याच्या जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
त्यांनतर राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी Railway Line आपला हिस्सा भरावा यासाठी मी बुधवार, दि. ४ मार्च २०२० रोजी तारांकित प्रश्न क्र १७०९ विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या महत्त्वपूर्ण विषयाला सभागृहात वाचा फोडली होती. या रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही तत्कालिन परिवहन मंत्री यांनी दिल्याने दि ९फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक ही घेण्यात झाली. त्यांनतर खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तांत्रिक टीमकडून बुलडाणा व जालना येथे येऊन पाहणी करून गेली
केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री ना रावसाहेब दानवे यांनी सुद्धा याबाबत बुलडाणा जिल्हयातील सर्व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या रेल्वे मार्गासाठीच्या सर्व्हेक्षण करण्यासाठी मान्यता दिली. जालना - खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणास रेल्वे बोर्डाने दिनांक ०८.०२.२०२२ रोजी मान्यता दिली आहे. Field Survey चे काम पूर्ण झाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल कार्यवाहीखाली असून जानेवारी, २०२३ मध्ये रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. तेव्हा पासून आ श्वेता महाले पाटील या रेल्वे मार्गासाठी राज्याने आपला हिस्सा भरावा यासाठी आग्रह धरला होता. परंतु त्यावेळी राज्यात काँग्रेस विदर्भ मराठवाडा विरोधी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांनी या रेल्वे मार्गा बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याच विषयावर त्यांनी २५ ऑगस्ट २०२२रोजी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे युतीचे सरकार आल्याने राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत याकरिता अशा निवडक प्रकल्पांमध्ये ४०% ते ५०% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण शिंदे फडणविस सरकारने स्विकारले आहे. तसेच उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना दि २६/२/२०२३ रोजी खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली होती . याबाबत कालच म्हणजे ८ मार्च रोजी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना लावून या विषयावर चर्चा घडवून आणली होती. काल झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमांतून विचारलेल्या प्रश्न अनुत्तरीत राहिला असला तरी उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थ संकल्पात या रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद केल्याने कालच्या लक्षवेधीला आज उत्तर मिळाले आहे.
रेल्वे लोक आंदोलन समितीच्या आंदोलनास सुद्धा मिळाले यश
या रेल्वे मार्गासाठी Railway Line रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली होती. आज झालेल्या घोषणेमुळे त्यांच्या आंदोलनाला सुद्धा यश आले आहे. खामगांव जालना या रेल्वे मार्गाचे ब्रिटिश काळात काम सुरु झाले होते. परंतु दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि या विदर्भ मराठवाडा या मागास भागाला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचे काम रखडले. या देशावर आणि राज्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेवर राहिली आहे. त्यावेळ पासुन तब्बल ११५ वर्षापासून विदर्भ आणि मराठवा ड्यातील जनता या रेल्वे मार्गाचे काम व्हावे यासाठी सातत्याने मागणी करित आहे. केवळ १६५ किलोमिटर लांबीच्या या रेल्वे मार्गाचे काम पर्ण करण्यासाठी काँग्रेस प्रणित कोणत्याही कुंभकर्णी सरकारला जाग आली नाही.
१६५ किलोमिटर लांबीचा असणारा हा रेल्वे मार्ग केवळ रेल्वे मार्ग नसून हा रेल्वे मार्ग आमच्या मागास असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याची भाग्य रेषा ठरणार आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास आणि उत्तर आणि दक्षिण भारत रेल्वे मार्गाने जोडल्या जाणार आहे. बुलढाणा व जालना हा जिल्हा अत्यंत मागास असून या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे नसल्याने प्रचंड बेरोजगारी आहे. खामगाव जालना रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षापासून असून हा रेल्वे मार्ग झाल्यास बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू होऊन बेरोजगारी दूर करण्यास मदत होईल.