तभा वृत्तसेवा
वर्धा,
जिल्ह्यात अवकाळी पावसाचे (stormy winds) तांडव सुरू आहे. शनिवार 29 रोजी रात्रीदरम्यान, वर्धा, देवळी-पुलगाव, सेलू हिंगणघाट तालुक्यात मेघगर्जेनेसह पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. रविवार सकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर सायंकाळपर्यंत होता. तळेगाव शा. पंत येथे वादळी वार्यामुळे काही झाडे उन्मळून पडली. या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून मशागतींची कामेही ठप्प पडले आहे.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात (stormy winds) अवकाळी पावसाचे तांडव सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी काही भागात वादळीवार्यासह गारपीट झाली तर वीज पडल्याने जिल्ह्यात आठ गुरांचा मृत्यू झाला असून अनेक घरांची पडझड झाली. ढगाळ वातावरण कायम असून शनिवारी 29 रोजी मध्यरात्रीपासून वर्धा, देवळी-पुलगाव, सेलू, हिंगणघाट तालुक्यात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर इतर तालुक्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली. रविवारी 30 रोजी ढगाळ वातावरण कायम होते. सकाळी आठ वाजता काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली.
अवकाळी पावसामुळे (stormy winds) ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळत झाले आहे. मे महिन्याला सुरूवात झाली आहे. शेतकरी शेतमशागतीच्या कामात व्यस्त होते. मात्र, गत आठवड्याभरापासून सूर्यदेवतेचे दर्शनच नाही. तर अधूनमधून पाऊस येत असल्याने शेत मशागतींची कामे ठप्प पडली आहे.