अलर्ट...देशातील अनेक भागात उष्णतेची लाट येणार

10 May 2023 09:35:32
नवी दिल्ली,
heat wave राष्ट्रीय राजधानीसह देशाच्या बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक होते. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते, मात्र सुरुवातीच्या काही दिवसांत दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कडक ऊन पडणार आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले जाऊ शकते.
 
 
WEERT
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच १३ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र त्यामुळे तापमानात घट होणार नाही. heat wave विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी, १० मे रोजी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हवामान स्वच्छ राहील. राजस्थानमध्येही येत्या काही दिवसांत कोरडे हवामान आणि तापमानात २-३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय १० मे रोजी राज्याच्या काही भागात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
यूपीमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत heat wave राज्यात हळूहळू उष्मा वाढू शकतो, असे विभागाचे म्हणणे आहे. यासोबतच १०, ११ आणि १२ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय सध्या हवामानात कोणताही विशेष बदल होणार नाही. यूपीमध्ये कमाल तापमान ३८ आणि किमान तापमान २४ राहण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्येही बुधवारी हवामान कोरडे राहील. मध्य प्रदेशात बुधवारी, १० मे रोजी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या राज्यांमध्ये मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. बंगालच्या उपसागरातून उठणारे मोका वादळ तीव्र होत आहे. यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.आयएमडीच्या डीजींनी सांगितले की, १० मे पासून ते हळूहळू वाढेल आणि आणखी तीव्र होईल. वादळाची परिस्थिती पाहता विभागाने मच्छिमार, जहाजे आणि लहान बोटींना आग्नेय बंगालच्या उपसागरात न जाण्यास सांगितले आहे. चक्रीवादळ ११ मे पर्यंत उत्तर-वायव्येकडून मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल, त्यानंतर त्याची दिशा बदलेल आणि ते बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे सरकेल.
Powered By Sangraha 9.0