heat wave राष्ट्रीय राजधानीसह देशाच्या बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक होते. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते, मात्र सुरुवातीच्या काही दिवसांत दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कडक ऊन पडणार आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले जाऊ शकते.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच १३ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र त्यामुळे तापमानात घट होणार नाही. heat wave विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी, १० मे रोजी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हवामान स्वच्छ राहील. राजस्थानमध्येही येत्या काही दिवसांत कोरडे हवामान आणि तापमानात २-३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय १० मे रोजी राज्याच्या काही भागात कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते.