तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दिवाळे, वेळा साखर कारखाना, बापुरावजी देशमुख सूत गिरणी डबघाईस येणे आणि आता 45 महिन्याच्या वेतनासाठी 26 दिवसांपासून कर्मचार्यांचे उन्हातान्हात उपोषण सुरू आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीही हातची गेली. यशवन्त ग्रामीण शिक्षण संस्थाही प्राणवायु राहिली आहे. राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेले (Sameer Deshmukh) समीर देशमुख यांनी मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवत वडिलांचा अमृत महोत्सव आयोजित केला. त्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचर्याना आर्थिक वेठीसही धरले. राजकीय नेत्यांनीही सढळ हाताने मदत उभी केली. ज्या परिसरात कार्यक्रम होतो आहे ती इमारत विद्युत रोषणाईने सजली. दुसरीकडे ज्या जिल्हा मध्यवर्तीने नावारूपास आणले ती इमारत आणि तेथील कर्मचारी, बँकेत करोडो रुपयांची ठेवी ठेवणारे बिचारे ठेवीदार रडकुंडीला आलेले आहेत.
45 महिन्यांच्या थकीत वेतनासाठी बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचार्यांनी 26 दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. समीर देशमुख यांच्या कार्यकाळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पार डब्बा वाजला. या बँकेने त्यांच्याच वेळा साखर कारखाना, सूतगिरणीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले ती वसुली न झाल्याने बँक डबघाईस आली आणि जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या (Sameer Deshmukh) परिवाराच्या अखत्यारीत 22 शाळा, 11 ज्युनिअर कॉलेज, 5 सिनिअर कॉलेज, शेवटचा घटका मोजत असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय एवढा गराडा आहे. माजी आ. सुरेश देशमुख यांनी मितभाषी स्वभावाने वर्धेकरांचे प्रेम मिळवले. त्याच्या प्रेमात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाची मोट बांधली. मात्र, त्याची धुरा समीर देशमुख यांनी स्वतःकडे ठेवली आणि तेथूनच वर्धेकर आणि कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. का? राकाँ जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांना दिलेला खांदा, बुटीवाड्यावरील हजेरी राकाँला महागात पडणार हेही स्पष्ट झाले आहे.
अमृत महोत्सवासाठी राजकीय व्यक्तींनी दिलदार होत लाखोंची मदत केली असताना मालकीच्या शाळा कॉलेजच्या प्राचार्य व वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक यांच्याकडून प्रत्येकी 15 हजार, प्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक प्रति 10 हजार, मुख्याध्यापक व हायस्कूल शिक्षक प्रत्येकी 8 हजार, मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक प्रत्येकी 5 हजार, लिपिक 4 हजार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 हजार, निवृत्त प्राध्यापक कडून 8 हजार तर निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये महोत्सवाकरिता जमा करण्यात आले आहेत. (Sameer Deshmukh) विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेची तिकीट मिळवत देवळी मतदार संघात तिसर्या क्रमांकाची मत समीर देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्ष ते कोणत्याच पक्षात नव्हते. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादीत शक्ती प्रदर्शन दाखवत नेता होण्याचा केविलवाना प्रयत्न होणार असला तरी मध्यवर्ती बँक डबघाईस आणल्याचा धब्बा पुसल्या जाणार