पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी

25 Jun 2023 18:41:13
मानोरा, 
Sowing जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्यास, अल्प पावसावर शेतकर्‍यांनी पेरणीचे घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे. तालुयातील काही शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या सोयाबीन पेरणीची लगबग सुरू केली आहे. मात्र, शेतकर्‍यांनी अल्प पावसावर पेरणी केल्यास नुकसानीचे ठरू शकते किंबहुना दुबार पेरणीची वेळ येण्याची शयता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प पावसावर पेरणी करण्याची घाई करू नये.
 
cft
 
खरीप पेरणी साठी शेतात भरपूर Sowing ओलावा किंवा ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरणी करावी. तसेच घरघुती राखून ठेवलेले तसेच मार्केटमधील खरेदी केलेली बियाणे पिशवी मधील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी व उगवण ७० टक्के पेक्षा कमी असल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये. सोयाबीन पिकात खोडमाशी, खोडकिड्यांचा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रभाव टाळण्यासाठी थिओफीनेट मिथाईल ११.२५ एफ. एस. व थिओमेथॉसाम २५% एफ. एस. या संयुक्त कीटकनाशकाची बीजप्रक्रिया ५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी. पेरणी करत असताना २ ते ४ सेंटीमीटर खोलीवरच करावी. जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याचा उगवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मानोरा तालुयात सर्वाधिक सोयाबीनच्या पिकाचा पेरा असणार आहे. तरी तालुयातील शेतकर्‍यांनी किमान पाच ते सहा इंच जमिनीमध्ये ओलावा झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0