तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Shasan Apya Dari : नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे, तसेच दैनंदिन कामासाठी लागणारे महत्वाचे दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध दाखले गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Apya Dari) हा उपक्रम सुरू केला आहे. शासन आपल्या दारी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक योजनांसाठी नोंदणी करावी तसेच दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
शासन आपल्या दारी (Shasan Apya Dari) उपक्रमांतर्गत बुधवारी यवतमाळ तालुक्यातील आकपुरी, आर्णी तालुक्यातील लोणबेहळ, कवठाबाजार, सुकळी, महागाव तालुक्यातील मुडाणा, भोसा गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ तालुक्यातील आकपुरी येथील शिबिराला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसिलदार योगेश देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गावातील नागरिकांना अगदी छोट्या कारणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी फेर्या माराव्या लागतात. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांना गावातच आवश्यक सेवा (Shasan Apya Dari) देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचा त्रास कमी होईल. शिवाय जनतेच्या अडचणी, तक्रारी तालुकास्तर अधिकार्यांना समजून घेता येईल.
शेतकर्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे घेताना बियाणे खरेदीची पावती अवश्य घ्यावी व ती सांभाळून ठेवावी. एखाद्यावेळी बियाणे खराब निघाल्यास किंवा उगवले नाही. तर या पावतीच्या आधारे शेतकर्यांना कंपनीकडे नुकसान भरपाई मागता येते. घरकुलसाठी लाभार्थ्यांना 9 जुनपर्यंत रेती घाटातून मोफत 5 ब्रास रेती नेता येते. (Shasan Apya Dari) मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री, पालक नसलेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. नागरिकांनी यासाठी अर्ज करावा. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दाखले, प्रमाणपत्र आवश्यक असतात.
या (Shasan Apya Dari) शिबिरात दाखल्यासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास सात दिवसाच्या आत आपल्याला प्रमाणपत्र व दाखले उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरी बचत गटासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पीएम किसान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनांचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकार्यांच्या हस्ते विविध योजनांचे निवड प्रमाणपत्र, तसेच दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यात महसुल, पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, एसटी महामंडळ, महावितरण, बँक, वनविभाग, आधार, पुरवठा विभाग इत्यादी विभागांचा समावेश होता.