नागपूर,
कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली ३ हजार ५०० कोटींची भूमी हडपून (land jihad) लँड जिहाद करणारा वक्फ कायदा रद्द करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती, नागपूर विभागातर्फे करण्यात आली. समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक अतुल अर्वेन्ला यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक येथे शनिवारी आंदोलन करण्यात आले.
१९०६ साली छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथील भूमी मुस्लिमांसह इतर समाजातील विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्ती अर्थातच शिक्षणासाठी दिली. त्यामुळे त्याचा वापर धार्मिक नियोजनासाठी करता येणार नाही, असे असतांना देखील वक्फ कायद्याचा दुरुपयोग करुन ती भूमी पूर्णपणे बळकाविण्याचे बेकायदेशीर प्रयत्न सुरु आहे. (land jihad) लँड जिहादमुळे अन्य मागास समाजातील विद्याथ्र्यांवर अन्याय होणार आहे. द मोहामेडन एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदिल फरास यांनी वक्फ बोर्डाच्या या बेकायदेशीर प्रक्रियेला विरोध केला आहे. यापूर्वीही बोर्डाने अनेक प्रकरणांमध्ये सामान्य जनतेची भूमी बेकायदेशीररित्या बळकविल्याची प्रकरणे समोर आली आहे. बोर्डाच्या या कृती थांबाव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
सामान्य जनतेची भूमी हडपून (land jihad) लॅण्ड जिहादला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी वक्फ कायदा त्वरीत रद्द करा, राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेली सदर भूमी हडपण्याच्या वक्फ बोर्डाच्या कृतीला शासनाने तीव्र विरोध करावा, व या बोर्डाचे सर्व आक्षेप अमान्य करावे. याप्रकरणात सहभागी असलेल्या संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. देशात समान नागरी कायदा लागू करुन अल्पसंख्याकांच्या नावार लागू करण्यात आलेल्या सर्व विशेष सुविधा, कायदे, आयोग, मंडळे, शासकीय विभाग संपुष्टात आणून सर्वांना समान वागणून द्यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास हिंदू जनजागृती समिती तीव्र आंदोलन करेल असा ईशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी qहदू जनजागृती समितीचे अभिजीत पोलके, नीरज अवधे, वैशाली परांजपे, शंकर बारई, आशीष नागपुरकर आदी उपस्थित होते.