तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी,
मराठवाडा विदर्भ सीमेवरील पुसद तालुक्यात पैनगंगा नदीवर असलेल्या (Isapur dam) ईसापूर धरणात 44.42 टक्के म्हणजेच 228.23 दलघमी जलसाठा शिल्लक असून या वर्षी पावसाळा लांबला असल्याने शेतकर्यांच्या मागणीवरून धरणातून वाढीव अवतरणेे सोडण्यात आली आहेत.
शेतीसाठी उपयुक्त एकउद्देशीय Isapur dam ईसापूर धरणात गतवर्षी 16 जुलै रोजी 630.89 दलघमी म्हणजे 65.44 टक्के जलसाठा होता. तर पाऊस 554 मिलीमिटर पडून 18 टक्क्यांनी धरणात वाढ झाली होती. मात्र तुलनेत या वर्षी आतापर्यंत 228 मिलीमिटर पर्जन्यमान झाले असून धरणात फक्त 1 टक्का पाणी वाढले आहे. शेतकर्यांच्या मागणीवरून धरणाच्या दोन्हीही मुख्य कालव्यांमधून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यासह उजव्या व डाव्या कालव्यातून 454.52 दशलक्ष घनमिटर पाण्याचा विसर्ग झाला आहे.