अर्जुनी मोरगावचा आठवडी बाजार चिखलात!

मूलभूत सुविधांचा अभाव

    दिनांक :17-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर, 
नगरपंचायत आणि तालुक्याचे ठिकाण असणार्‍या Arjuni Morgaon अर्जुनी येथे भरणारा आठवडी बाजार चिखलाच्या साम्राज्यात भरतो आहे. केवळ कमिशन खोरीच्या नादात असणारे येथील पदाधिकारी आणि अधिकारी यांना याचा काहीच सोयर सुतक नाही. 2015 ला या ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रूपांतर झाले. नगर पंचायतचा थेट राज्य शासनाची संपर्क येतो. भरपूर प्रमाणात नगरपंचायतींना निधी मिळतो. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेले अर्जुनी शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते. नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती. आठ वर्षे लोटली मात्र नागरिकांचा भ्रमनिरास सुरू आहे. ही नगरपंचायत सध्या आठवडी बाजारातील चिखलाच्या साम्राज्याने चर्चेचा विषय झाली आहे. शहराचा विकासात्मक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून नागरिकांना उत्तम सुविधा देणे नगरपंचायतचे कर्तव्य आहे. मात्र दर शनिवारला भरणारा आठवडी बाजार पायाभूत सुविधांच्या अभावी भरवीला जातो.
 
Arjuni Morgaon
 
अर्जुनी शहराच्या मध्यभागी Arjuni Morgaon बाजारवाडीची नियोजित जागा उपलब्ध आहे. मात्र या नियोजित जागेवर धनदांडग्याणी कायमस्वरूपी अतिक्रमण करून बाजार वाडीची जागा घशात घातली आहे. नगरपंचायतच्या मालकीची जागा असूनही महसूल विभागाच्या हेलिपॅड मैदानावर बाजार भरविला जातो. पावसाळ्यात या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागते. दरम्यान कधीही चिखलात घसरून पडण्याची भीती ग्राहकांना असते. मजबुरीपोटी दुकानदार आणि ग्राहक नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा मुका मार सहन करीत आहेत. या परिसरात आता तर चिखलासह घाणीचे साम्राज्य ही निर्माण झाले आहे. बाजारवाडीचे ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांचा अभाव आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र बाजार लिलाव करून मोकळे होणे एवढीच जबाबदारी नगरपंचायत बजावत आहे.
 
 
मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे ही Arjuni Morgaon नगरपंचायतीची जबाबदारीअर्जुनी शहरातील आठवडी बाजाराचा लिलाव एक वर्षासाठी 11 लाखात घेण्यात आला असून संपूर्ण रक्कम नगरपंचायतला जमा सुद्धा करण्यात आली आहे. पुर्वी आठवडी बाजार शहराच्या मध्यभागी भरायचा. तिथे सर्व सुविधा व प्रशस्त जागा उपलब्ध सुध्दा आहे. मात्र कोरोना काळापासून हा बाजार शहराच्या बाहेर नेण्यात आला. तिथे आजपर्यंत नगरपंचायतीने कोणतीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी वारंवार नगरपंचायत अध्यक्षांसह मुख्याधिकारी व नगरसेवकांकडे लेखी व तोंडी मागणी करीत आहोत. परंतु अजुन पर्यंत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.
- बादल लाडे, बाजार ठेकेदार अर्जुनी मोर.