अजित पवारांच्या रूपात राज्याला मिळाले दुसरे उपमुख्यमंत्री

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राकाँचे नऊ मंत्री सहभागी

    दिनांक :02-Jul-2023
Total Views |
मुंबई, 
Ajit Anantrao Pawar : राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा भूकंप अनुभवला असून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. अजितदादांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी सोहळा पार पडला.अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. हे बघा : महाराष्टाच्या राजकारणात भूकंप? अजितदादा बनणार उपमुख्यमंत्री
 
Ajit Anantrao Pawar
 
 
अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
 
 
 
राकाँच्या 40 आमदारांचा सरकारला पाठिंबा- बावनकुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा आहे, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमु‘यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बावनकुळे पत्रकारांसोबत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
 
 
 
देवगिरी आणि उपमुख्यमंत्री
मुंबईत उपमुख्यत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ‘वर्षा’ बंगाल्याची ओळख आहे, त्याच प्रमाणेच ‘देवगिरी’ हा बंगाल उपमु‘यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. वर्षभरापूर्वी जेव्हा आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले पद सोडावे लागले होते आणि बंगलाही रिकामा करावा लागणार होता. मात्र, तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमु‘यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवत देवगिरी बंगला अजित पवारांकडे कायम ठेवला होता आणि स्वत: विरोधीपक्ष नेत्याच्या बंगल्यात राहाणे पसंत केले होते. ही घटना आजच्या घटनेचा संकेत तर नव्हता ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
 
 
दिल्लीतून गुगली, बिमर, स्पिन, यॉर्कर एकत्र पडले
आपण गुगली टाकून देवेंद्र फडणवीस यांची विकेट घेतली, असे म्हणणार्‍या शरद पवारांवर दिल्लीतून गुगली, बिमर, स्पिन, यॉर्कर हे गोलंदाजाच्या भात्यातील सर्व चेंडू एकत्र टाकले गेले आणि पवारांचीच विकेट पडली, अखेर राष्ट्रवादी काँग‘ेसही फुटली. उद्धव ठाकरेंपाठोपाठ पवारांची घराणेशाही त्यांच्या देखत उद्ध्वस्त झाली. दिल्लीत बसलेल्या पवार शिष्याने स्वत:ची करामत दाखवली. राष्ट्रवादी काँग‘ेसचे 35 आमदार फोडून अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत शरद पवारांना बाय-बाय केला. शरद पवारांचा सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी पूर्ण उद्ध्वस्त केला.