-एफएओची माहिती
- अन्न वैविधता संपुष्टात येणे धोकादायक
नवी दिल्ली,
100 वर्षांत धान्याचे जवळपास 90 टक्के प्रकार गायब झाले आहेत. यात तांदूळ, तीळ, डाळी आणि भरड धान्याचा समावेश आहे. यापेक्षा चिंतेची मोठी बाब म्हणजे, आपल्या खाद्यात सध्या ज्या धान्याचा समावेश आहे, त्यापैकी एकतृतीयांश धान्याचे प्रकार 2050 पर्यंत संपुष्टात येतील, अशी धक्कादायक माहिती अन्न व कृषी संघटनेने दिली.
grains Types धान्याचे प्रकार संपुष्टात येत असल्याने कृषी जैवविविधता धोक्यात आली आहे. सध्या जे धान्य अस्तित्वात आहे, त्यात तांदूळ, गहू आणि मक्यासारखे काही प्रकार जगभरातील लोकांचे पोट भरत आहे. जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात धान्यात कित्येक बदल झाले. त्याचे कित्येक हायब्रिड वाण तयार झाले. त्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात दिसत असले तरी, त्यातील पोषणमूल्य घटले आहे.
स्थानिकची जागा घेतली विदेशी वाणांनी
grains Types भरड धान्यातील कित्येक वाणांच्या ऐवजी लोक लांब तांदूळ आणि बारीक गव्हाचा वापर करू लागले. पिझ्झा आणि बर्गरमध्ये असते तशीच ही एकप्रकारची एकरूपता आहे. जगभरातील कोणत्याही देशाच्या आऊटलेटमध्ये गेल्यास पिझ्झा आणि बर्गरची चव एकसारखीच असते. हाच प्रकार पिकांसोबतही झाला. स्थानिक भरड धान्य, भाजीपाला गायब झाला आणि रंगीत पत्ताकोबी, संकरित काकडीने त्याची जागा घेतली.
देशातून काय गायब होतेय्?
- कनार्टकातील मटकी वेगाने संपुष्टात येत आहे. त्या जागी तुरीच्या डाळीचे पीक घेतले जात आहे.
- छत्तीसगडमधील कर्हानी हे काळे तांदूळ गायब होत आहे. त्याऐवजी सरकार हायबि‘ड तांदळावर भर देत आहे.
- दंतेवाडातील महेर धान नावाचा काळा तांदूळ गायब होत आहे. त्याची जागा हायबि‘ड तांदळाने घेतली आहे.
- ओडिशात जवस आणि बाजरीचे कित्येक प्रकार मिळायचे. ते वेगाने गायब झाले. त्याच्या जागी आले, हळद आणि अननसाचे उत्पादन घेतले जात आहे.
- मेघालयात लाल आणि काहीसा चिकट तांदूळ असायचा. त्याची जागा हायबि‘डने घेतली आहे.