तभा वृत्तसेवा
अमरावती,
सामान्य जनतेचा प्रसारमाध्यमांवर अधिक विश्वास आहे. तो तसाच कायम राहावा म्हणून माध्यामांनी सुद्धा कितीही अडचणी आल्या तरी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन Dr. Uday Nirgudkar ज्येष्ठ पत्रकार, स्तंभ लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ जनसंपर्क विभाग, अमरावती श्रमिक पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 19 ऑगस्ट रोजी ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर पत्रकार कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी ते बीजभाषक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रमुख अतिथी म्हणून दै. लोकमत, मुंबई आवृत्तीचे सहयोगी संपादक यदू जोशी, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे व यशदा, पुणेचे माजी सदस्य राजीव साबडे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे गोपाल हरणे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भैय्यासाहेब मेटकर, विद्यापीठ अधिसभा सदस्य गिरीश शेरेकर व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर Dr. Uday Nirgudkar आदी उपस्थित होते.
डॉ. निरगुडकर Dr. Uday Nirgudkar पुढे म्हणाले, प्रेक्षक आणि वाचक यांच्याकडे दुर्लक्ष केले तर तो बाजुला जाईल आणि जाहिरातींकडे दुर्लक्ष केले तर अर्थकारण बिघडेल अशी आज समस्या निर्माण झाली आहे. या क्षेत्राचे व्यावसायीकरण जरी होत असले तरी विरोधात वृत्त देण्याचे धाडसही तेवढेच हवे असेही ते म्हणाले. तरूण पत्रकारांनी विश्वास वाढविणारी पत्रकारीता करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पत्रकारिता एक मिशन : कुलगुरू
पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांनी एक मिशन म्हणून कार्य केले पाहिजे. समाजाचा विश्वास अधिक महत्वाचा असतो. वाचन प्रक्रिया वाढली पाहिजे. संवेदनशीलता व मानवता समाजात रुजली पाहिजे असे सांगून कुलगुरू डॉ. येवले म्हणाले.
पत्रकारितेत खूप खाचखळगे : यदू जोशी
दुसर्या सत्रात ‘सोशल मीडिया व प्रसार माध्यमे’ या विषयावर यदू जोशी म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात खूप खाचखळगे आहेत. बोलणे आणि प्रत्यक्ष काम करणे यात खूप फरक आहे. इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वत:कडे आधी पहावे. समाजजागृतीचे काम पत्रकारांना करावयाचे आहे. मुद्रीत माध्यमांपुढे मोठी आव्हाने उभी ठाकली असली तरी विश्वासहार्यता पण त्यांच्याच कडे कायम आहे. लोकविद्यापीठातून खूप काही शिकता येते असे सांगून पत्रकारीतेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्लॅमर म्हणून जर या क्षेत्रात येत असेल तर त्यांनी दूरच रहावे, असा सल्ला त्यांनी दिला.
विश्वसनीय बातम्या द्याव्यात : साबडे
तिसर्या सत्रात ‘ग्रामीण पत्रकारिता व भाषा संवर्धन’ या विषयावर राजीव साबडे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांना बातमी देताना अनेक प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. मनात भीती सुध्दा असते. असे असले तरी ग्रामीण भागातही अनेक चांगल्या बाबी आहेत, त्या सुध्दा ग्रामीण पत्रकारांनी समाजासमोर आणल्या पाहिजेत. पत्रकारितेत सतत शिकत राहिले पाहिजे. कोणाशीही संपर्क ठेवताना मर्यादा देखील पाळाव्यात. विश्वसनीय बातमी द्यावी, असा सल्ल त्यांनी दिला. संचालन रवींद्र लाखोडे, संजय बनारसे यांनी तर आभार कृष्णा लोखंडे, प्रफुल्ल घवळे, गौरव इंगळे यांनी मानले. कार्यशाळेला पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.