- शिवसेना तालुकाप्रमुखांची पालकमंत्र्यांना निवेदनातून मागणी
उमरखेड,
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे असलेले Isapur Dam ईसापुर धरण त्यावरील डाव्या कालव्याचे काम ढाणकी गावा पुढील आठारी या नाल्यापर्यंतच झालेले आहे पुढील अपूर्ण कामे तात्काळ सहस्रकुंड पर्यंत पूर्ण करून त्या भागातील शेतकर्यांना सिंचनाचा दिलासा द्यावा करिता शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदनातून मागणी केली आहे .
Isapur Dam ईसापूर धरणाची बांधणी करण्यासाठी विदर्भातील अनेक गाव, तांडे यांनी आपल्या सुपीक जमिनीसह शेकडो एकर शेतजमिनी शासनाला भूसंपादित केल्या. आपल्या भागात धरण झाल्यास त्याचा फायदा होईल. परंतु ईसापूर धरणावर उजव्या कालव्याद्वारे मराठवाड्यात तसेच आंध‘प्रदेशपर्यंत पूर्णतः पाणी सोडले जाते.
डाव्या कालव्याच्या पुढील अपूर्ण कामे चिंचोली, चिंचोली तांडा, खरुस, दत्तनगर, अकोली, अकोली तांडा, मन्याळी, बिटरगाव, भोजनगर तांडा, टेंभुरदरा, रतन नाईक नगर तांडा, पिंपळगाव, जेवली, मथुरानगर, लिंगी, मुरली या गावांत सिंचनाचा फायदा होऊ शकतो. म्हणून सहस्रकुंडपर्यंत उजव्या कालव्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. विदर्भातील काही मोजक्याच गावांना या कालव्याचा फायदा होत असून अनेक गावे यापासून वंचित आहेत. त्यातच या भागातील विहिरी जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. याविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शेतकर्यांच्या हितासाठी डाव्या कालव्याचे पाणी, तसेच राहिलेली अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी करिता शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण मिरासे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी केली आहे . याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून तत्काळ विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख चितांग कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख बालाजी महाले व मुरली येथील अशोक चव्हाण उपस्थित होते.