आशिया चषक स्पर्धा बुधवारपासून

    दिनांक :29-Aug-2023
Total Views |
कोलंबो, 
श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. बुधवारी मुल्तान येथे पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात स्पर्धेचा उद्घाटनीय सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेत सहभागी सहापैकी नेपाळ वगळता पाच संघांना आगामी वन-डे क्रिकेट विश्वचषकाची तयारी करण्याची अखेरची संधी आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंकडील चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या तीन संभाव्य हाय-व्होल्टेज सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.
 
 
Asia Cup
 
5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेपूर्वी या आशिया चषक स्पर्धेच्या माध्यमातून पाकिस्तान भारताशी पुन्हा क्रिकेट संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. गत दशकभरात उभय देशांदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट मालिका घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार्‍या आशिया चषकामुळे सहभागी संघांना जागतिक स्तराच्या स्पर्धेचे वातावरण मिळेल व ते जणू वन-डे विश्वचषकाचे प्रतिबिंब असेल. सात वेळचा विजेता म्हणून भारतीय संघ आशिया चषकात उतरणार असून आठवे विजेतेपद जिंकण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावणार आहे. विजेतेपदाचे नक्कीच स्वागत केले जाईल, परंतु मु‘य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश असलेल्या क्रिकेट तज्ज्ञांना विश्वचषकापूर्वी संघ अधिक मजबूत करावा लागेल. केएल राहुलला आशिया चषकासाठी सशर्त संघात सहभागी करून घेतले आहे, परंतु तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे.
त काही तुकडे पडतील हे पाहण्यास उत्सुक असेल.
मुख्य प्रशिक्षक द्रविडच्या म्हणण्यानुसार केएल राहुलला सशर्त भारतीय संघात सामील करण्यात आले आहे आणि तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. पल्लेकेले येथे 2 सप्टेंबर रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होईल, तेव्हा श्रेयस अय्यर मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. आशिया चषक संघात निवड होण्यापूर्वी श्रेयसने एनसीएमध्ये नेट व मॅच सिम्युलेशन प्रक्रि‘येतून चांगली कसरत केली होती.
 
 
पण उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस वास्तविक सामन्यात कठोरतेला कसा प्रतिसाद देतो हे बघण्यास व्यवस्थापन उत्सुक असेल. जसप्रीत बुमराह व प्रसिध कृष्णाबाबतही सारखीच चिंता असेल. या महिन्याच्या सुरुवातीला आयर्लण्डविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केले व तीव‘तेने गोलंदाजी केली होती. पण वन-डे क्रिकेटची मागणी टी-20 पेक्षा वेगळी आहे, कारण वन-डेमध्ये क्षेत्ररक्षणाशिवाय 10 षटके टाकावी लागतील. श्रीलंकेतील दमट परिस्थितीत बुमराह कामाचा भार कसा सहन करतो, हे बघण्यासाठी भारतीय व्यवस्थापन उत्सुक असेल.
 
 
भारत आशिया चषक स्पर्धेतील मुख्य संघ राहिला आहे, परंतु पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान हे सुद्धा लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतील. दुष्मंथा चामिरा, वनिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा व दिलशान मधुशंका आपल्या दुखापतींनंतर श्रीलंकेला पुन्हा आशिया चषक जिंकून देण्यासाठी संघर्ष करतील. बांग्लादेश संघाची बांधणी अनेक वेळा घडते तशी कोलमडत आहे. जखमी तमीम इक्बाल व एबडोत होसेनला संघाच्या बाहेर ठेवले आहे, ज्यामुळे सहा वर्षांनंतर शाकीब अल हसनला वन-डे संघ कर्णधार म्हणून पुन्हा नियुक्त केले आहे.
 
 
पाकिस्तानचा संघही आशिया चषक जिंकण्यासाठी उत्सुक असेल, कारण या स्पर्धेच्या विजेतेपदामुळे वन-डे विश्वचषक मोहिमेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर त्यांनी आयसीसी एकदिवसीय क‘मवारीतही प्रथम क‘मांकावर मजल मारली व ते योग्य वेळी शिखरावर पोहोचू शकतात. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान प्रतिस्पधी संघाचे नूतनीकरण होईल व वन-डे विश्वचषकाच्या पृष्ठभूमीवर काही नवीन नायकांचा उदय होताना दिसेल.