तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोरगाव,
नुकत्याच आरक्षण सोडत झालेल्या Police Patil recruitment पोलिस पाटील पदांच्या अर्ज सादर करण्याच्या तारीख व भरती प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावर विश्वास न ठेवता उपविभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार येत्या काही दिवसांत जाहिरामा प्रसिद्ध केल्यानंतर पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करून पारदर्शक आणि शिस्तबद्धपणे राबविली जाईल, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने गावातील कायदा Police Patil recruitment व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उपविभाग गोंदिया, तिरोडा, देवरी व अर्जुनी मोरगाव यांच्या अधिनस्त पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया 27 ऑगस्ट रोजी जाहिर केली आहे. तत्पुर्वी 21 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात बिंदू नामावली मंजूर करून आरक्षणानुसार पदसंख्या व पदभरतीच्या अनुषंगाने आरक्षण काढण्यात आले. येथील उपविभागात 95 पदाकरिता आरक्षण सोडत काढण्यात आली. 25 गावातील काढलेल्या आरक्षणावर हरकत घेण्यात आली आहे. जाहिरामा प्रसिद्ध झाला नसताना उमेदवारांमध्ये अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात संभ्रम पसरविला जात आहे.
पद भरती कालबद्ध कार्यक्रमानुसार नागरिकांमध्ये Police Patil recruitment पोलिस पाटील पदाकरिता अर्ज करण्याच्या आणि अखेरच्या तारखेबाबत सामाजिक माध्यमांवर अनेक अफवा पसरवण्यात आल्या, त्यानुसार निवड समितीचे अध्यक्ष वरणकुमार शहारे यांनी पोलिस पाटील पदाकरिता काही तांत्रिक बाबींमुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नाही. लवकरच जाहीरनामा काढण्यात येईल, त्यानंतरच अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल, नागरिकांनी भूलथापा, अफवांवर विश्वास ठेवू नये. असे कळविले आहे.
अनेक वर्षांपासून येथील उपविभागा अंतर्गत येणार्या गावांमध्ये 60 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावागावात पोलीस पाटील पदाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. Police Patil recruitment ऑफलाइन अर्ज प्रक्रिया असल्यास उपविभागीय कार्यालयाच्या दूर अंतरावरील उमेदवारांना कार्यालयात ये-जा करावी लागेल त्या अनुषंगाने यात अधिक पारदर्शकता असावी आणि उमेदवारांना त्रास होणार नाही या हेतूने जाहीरनामा निघाल्यानंतर पोलीस पाटील पदाबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल असेही शहारे यांनी सांगितले. आरक्षण सोडतीवर 25 गावातील नागरिकांनी हरकत घेतली.
विशिष्ट जातीचे नागरिकांचे गावात वास्तव्य नसताना आरक्षण ककाढले आहे. याबाबत Police Patil recruitment नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. त्यावर, उपविभागीय कार्यालयाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करून सूचना मागविण्यात येणार आहे. ठरलेल्या आरक्षणाचा उमेदवार त्या गावात उपलब्ध न झाल्यास किंवा ज्या ठिकाणाहून अर्ज येणार नाहीत. त्या ठिकाणी पोलीस पाटील पदांसाठी 16 ऑक्टोबर 2008 च्या शासन निर्णयानुसार नव्याने आरक्षण ठरवून पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया एकत्र राबवली जाणार आहे.