मानोरा,
Kisan Samman Yojana तालुक्यातील कुपटा येथील अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी पात्र असताना ते या लाभाच्या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करीत शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले व याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.कुपटा व परिसरातील अनेकांच्या नावावर शेती असूनही पीएम किसान पोर्टलमध्ये त्यांच्या नावावर शेती दाखवत नाही. त्यामुळे शेतकर्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तहसील कार्यालयात बरेच वेळा फिजिकल व्हेरिफिकेशन करून सुध्दा सदर समस्या सुटली नाही.
या संदर्भात तहसील व कृषि कार्यालयात अधिकार्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी भेट घेतली असता एकमेकाकडे बोट दाखवून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. Kisan Samman Yojana याबाबत न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले असता त्यांनी येत्या १५ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बळीराजा शेतकरी संस्थेचे अध्यक्ष नागोराव राठोड, उपाध्यक्ष प्रज्योत देशमुख, सचिव विजय घोडे आदीसह शेतकर्यांची उपस्थिती होती.