तभा वृत्तसेवा
अमरावती,
परतवाडा ते अमरावती (Patrwada to Yavatmal) व तेथून पुढे यवतमाळ करंजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून चार पदरी करण्यात यावा, अशी मागणी अमरावती एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 28 जुलैला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी विक‘ेता विकास कार्यक‘म व सोलर चरखा सीएफसी फॅसिलीटीजचे उद्घाटन करण्यासाठी अमरावतीला आले असता एमआयडीसी इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, हा रोड तयार झाल्यास एनएच 44 (करंजी), एनएच 53 (अमरावती), एनएच 16 (बैतुल) आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील समृद्धी महामार्ग हे महत्त्वाचे महामार्ग जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्तरेत मध्य प्रदेश आणि दक्षिणेस तेलंगाना हे सुद्धा एकमेकांशी या रस्त्याद्वारे जोडल्या जातील. सध्या (Patrwada to Yavatmal) परतवाडा ते अमरावती हा राज्य महामार्ग एमएसएच 1 4 दोन पदरी असून या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. या रस्त्यावर अतिशय जड वाहने चालतात. या व्यतिरिक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट, कार, दुचाकी यामुळे वर्दळ अतिशय जास्त प्रमाणत असते. त्यामुळे वेळही जास्त लागतो व अपघात होण्याची भीती असते.
अमरावती हे शहर भारतातील अतिशय वेगाने वाढणारे शहर म्हणून गणल्या जाते. या Patrwada to Yavatmal शहराची व जिल्ह्याची ओळख कपड्यांसाठी आणि संत्रा उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ म्हणून आहे. त्यामुळे दूरदुरुन लोक अमरावतीला येतात. एमएसएच14 हा दुपदरी असल्याने बैतुल, खंडवा, परतवाडा, यवतमाळ येथून लोकांना अमरावतीला येणे त्रासदायक होते. त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण होऊन पुढे तो यवतमाळपर्यंत जाडणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.