जंगली श्वापदांचा बंदोबस्त करण्याची शेतकर्‍यांची मागणी

    दिनांक :17-Sep-2023
Total Views |
मनभा,
wild animals येथुन जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील शेतकर्‍यांनी जंगली श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी कारंजा लाड येथील वन विभागाकडे केली आहे. येवता येथील शेतकरी वर्ग जंगली श्वापदापासून त्रस्थ झाला आहे. रान डुक्कर, निलगाय, हरिण यांच्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्री शेतामध्ये जागरण करावे लागते.
 
 
wild animals
 
येथील शेतकर्‍यांची शेती जंगलास लागुन असल्यामुळे वन विभागाने जंगली श्वापदांचा बंदोबस्त करावा किंवा जंगलास तारेचे कुंपन करावे, तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. wild animals उपरोक्त मागणीची तातडीने दखल न घेतल्या गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी वन विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत ठाकरे, तालुकाध्यक्ष हर्षद पारे, प्रहारचे मंगेश हिरडे, उपसरपंच गणेश आलोटे, विशाल लाडोणे, निवृत्ती बोनके, श्रीराम कदम व शेकडो शेतकरी उपस्थित होते.