राष्ट्ररक्षा
जातीय दंगली, हिंसक आंदोलने, हिंदू-मुस्लिम दंगे भारतात अनेक वेळा होतात. अनेक वेळा मोठा जमाव, इतर समाजाच्या घरांवर हल्ले करतो. त्या घरात राहणार्या लोकांना मोठ्या जमावापासून स्वतःचा बचाव करणे कठीण जाते. हिंसक जमाव मालमत्तेची नासधूस करतात, जाळपोळ करतात आणि तेथे राहणार्या निष्पाप लोकांना मारतात. अशा हिंसक जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत? पोलिस येईपर्यंत या लोकांचे संरक्षण करण्यासाठी Protection measures कोणती पद्धत वापरली पाहिजे? हिंसक जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी आणि पोलिस येईपर्यंत लोकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
काही पैलू खालीलप्रमाणे-
हिंसक जमाव : या हिंसक जमावाची शस्त्रे असतात, Protection measures दगडफेक, गावठी स्फोटके, सुरे, तलवारी, कुर्हाडी आणि इतर लोकल शस्त्रे. जमावामधल्या काहींकडे लायसन्स किंवा नॉन लायसन्स शस्त्रे-बंदुकासुद्धा असतात. जमावाचे नेतृत्व त्या भागातली गुंड मंडळी करतात. त्यांना एकत्र येण्याकरिता व्हॉट्स अॅप किंवा मोबाईलवर संदेश दिले जातात; ज्यामुळे अगदी थोड्या वेळात युवक हिंसा करण्याकरिता एकत्र येऊ शकतात. तणावग्रस्त परिस्थितीमध्ये जर अशा गुंडांच्या मोबाईलवर लक्ष ठेवता आले तर त्यांना आधीच पकडता येईल. मोबाईल किंवा अन्य समाजमाध्यमातून भडकावू संदेश, चित्रे पाठवली जातात; ज्यामुळे जमाव हिंसक करण्याकरिता तयार होतो. हिंसक जमावाविरुद्ध वापरण्याची साधने-संशयास्पद व्यक्ती आणि जमावावर लक्ष ठेवणे आणि युक्तीचा वापर करून त्यांना घाबरवणे. संरक्षणाकरिता नॉन लिथल शस्त्रांचा वापर करणे.
हिंसाचाराला सुरुवात कशी होते?
आतापर्यंत असे बघितले गेले आहे की, हिंसक जमाव हळूहळू एकत्र येतो, त्याची संख्या वाढते आणि अचानक हिंचाचाराला Protection measures सुरुवात होते. त्यावेळेस तिथे असलेले पोलिस जनतेचे फारसे रक्षण करू शकत नाही. कारण ते म्हणतात की, जमावाची संख्या खूपच जास्त होती. म्हणूनच जर हिंसक जमावापासून रक्षण करायचे असेल तर हिंसेच्या वेळेला पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याकरिता पोलिसांच्या क्विक रिएक्शन टिम या तणावग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात केल्या पाहिजेत. एसआरपीएफ आणि अर्धसैनिक दलांना त्या भागात लवकरात लवकर आणले जावे. गरज पडली तर सैन्याचीसुद्धा तैनाती करता येईल. कुठल्या भागामध्ये, कुठल्या क्विक रिएक्शन टिमला तैनात करता येईल? मदत कुठून आणता येईल, याचा वेळोवेळी अभ्यास केला जावा; ज्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा पोलिस वेळेवर पोहोचतील आणि हिंसक जमावाला हिंसा करण्यापासून थांबवू शकतील. प्रत्येक घराचे आणि किंवा सोसायटीचे रक्षण करण्याची पद्धत, त्या त्या घराच्या आणि सोसायटीच्या रचनेवर अवलंबून असेल. म्हणून एखाद्या पोलिस किंवा अर्धसैनिक दलातील किंवा लष्करी अधिकार्यांकडून नेमके त्या जागेचे संरक्षण कसे करायचे, याचे एक विश्लेषण करून, अंमलबजावणी करण्याचा एक प्लॅन तयार केला जावा. मात्र, काही मुद्दे जे सगळ्या प्रकारच्या घरांना आणि परिस्थितीला कॉमन असतील; ते खाली दिले आहेत. घराचे आणि घरात राहणार्या माणसांचे नुकसान कमी करण्याकरिता तीन परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपाय करता येईल.
तणावाच्या परिस्थितीत काय करायचे?
जर तणाव जास्त निर्माण झाला असेल आणि हिंसक हल्ला होण्याची शक्यता वाढली असेल तर बायका, मुले, आजारी व वृद्ध म्हणजे, कमजोर घटकांना घरातून दुसर्या नातेवाईकांच्या घरी सुरक्षित स्थळी पोहोचवावे; ज्यामुळे त्यांचे रक्षण होईल आणि घराच्या आत फक्त धडधाकट तरुण माणसांनीच राहावे. परिणामी हल्ला झाल्यास चांगला प्रतिकार करता येईल. पोलिसांनी ड्रोन्सचा वापर करून जमावावर लक्ष ठेवावे, यांचे चित्रीकरण करावे. त्यानंतर हिंसक आंदोलकांना पकडणे सहज सोपे जाईल.
जमावाचा हल्ला होत आहे,
त्यावेळेला काय करायचे?
रक्षण करण्याचे महत्त्वाचे तत्त्व आहे की, हिंसक जमावाला वेगवेगळ्या पद्धतीने लांब अंतरावरच घाबरवून थांबवणे. तरीही जमाव अजून जवळ आला तर त्याच्यावर विविध ‘नॉन लिथल वेपन्स’ म्हणजे कमी घातक शस्त्रांच्या मदतीने त्यांना काही वेळ थांबवणे, Protection measures जोपर्यंत इतर नागरिक, पोलिस किंवा अर्धसैनिक दलांची मदत वस्तीचे रक्षण करायला तिथे पोहोचतील. जेव्हा आजूबाजूच्या भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपल्या गल्लीचे/मोहल्याचे किंवा घराचे रक्षण करण्याकरिता एक टेहाळणी पथक तयार करावे; जे आजूबाजूला लक्ष ठेवून संशयास्पद जमाव किंवा संशयास्पद व्यक्ती किंवा संशयास्पद कारवाई होत असेल तर त्याची माहिती लगेचच सगळ्यांना देतील. यामुळे हिंसा होण्याच्या आधीच त्यांना थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.
प्रत्येक घरामध्ये एक बॅटरी ऑपरेटेड मेगाफोन असणे गरजेचे आहे. यामुळे मोठ्या आवाजात घोषणा करून किंवा आरडाओरडा करून हिंसक जमावाला घाबरवता येईल. त्यांना वाटेल की, या भागांमध्ये संरक्षणाकरिता पुष्कळ जास्त व्यक्ती उपस्थित आहेत. गल्लीमध्ये एक-दोन घरामध्ये पोलिस सायरनचा आवाज करणारे सायरन असतील आणि ते वाजवले तर त्यामुळे हिंसक जमावाला असे वाटेल की, पोलिस येत आहेत आणि ते हिंसाचार करण्याऐवजी पळून जातील. हिंसक जमावाच्या विरुद्ध केलेली आक्रमक कारवाई ही ‘नॉन लिथल वेपन्स’ म्हणजे कमी घातक शस्त्रांच्या मदतीने केली जावी. यामध्ये गुलेरचा वापर, वॉटर कॅनन्स म्हणजे पाण्याचा वापर करणे, मिरची स्प्रे किंवा बाजारामध्ये मिळत असलेल्या शस्त्रांचा वापर केल्यास हिंसक आंदोलक काही वेळ निष्क्रिय होतील.
Protection measures : आज अनेक नॉन लिथल वेपन्स मार्केटमध्ये मिळतात. याचा वापर आपण हिंसक जमावावर नक्कीच करू शकतो. मात्र, या अशा नॉन लिथल शस्त्रांचा वापर हा दुरून करता आला पाहिजे. हिंसक जमावाशी समोरासमोर असा मुकाबला होणार नाही.
कमी बोअर असलेली शस्त्रे आणि लायसन्स वेपन्सचा वापर फक्त स्वतःच्या संरक्षणाकरिताच करता येईल.
कारवाई ही देशाच्या कायद्याच्या आत बसलेली पाहिजे आणि कुठलीही बेकायदेशीर कारवाई केली जाऊ नये.
हिंसाचार झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळविण्याकरिता करायची कारवाई
हिंसक हल्ला होताना सगळ्या मोबाईलमधून केलेले व्हिडीओज एकत्र करून पोलिस स्टेशनला द्यावे आणि एक समिती निर्माण करून झालेल्या नुकसानाची भरपाई हिंसक जमावापासून करण्याकरिता सरकारला भाग पाडावे.
प्रतिबंधात्मक उपाय
(प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे वेळोवेळी सेक्युरिटी ऑडिट करा आणि काही कमी असल्यास त्याला दूर करा)
घरांच्या प्रवेशद्वारांवर मजबूत आणि सुरक्षित दरवाजे आणि खिडक्या बसवा. सुरक्षा प्रणाली स्थापित करा. यामध्ये सुरक्षा गार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा भिंत किंवा फोन्स/तारेचे कुंपण यांचा समावेश असू शकतो.
घराच्या आत आणि बाहेर सिक्युरिटी कॅमेरे बसविल्यास हिंसक जमावाच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जाऊ शकतील.
घरात एक मोठा पाण्याचा साठा ठेवा; जो आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
घरात एक मोठा बॅटरीचलित रेडिओ ठेवा; जेणेकरून तुम्हाला बातम्या आणि संकटकालीन सूचना मिळू शकतात.
घरात अग्निशमन यंत्र आणि इतर आवश्यक संसाधने ठेवणे. यामुळे जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केल्यास आग लगेच काबूमध्ये आणता येते.
तुमच्या शेजार्यांशी संपर्क साधा आणि हिंसक जमावाच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. Protection measures आपल्या समुदायातील इतर लोकांशी संबंध साधा. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही संपर्कात राहू शकता. आपापल्या भागामध्ये सुरक्षेकरिता व्हॉट्स अॅपचे ग्रुप तयार करा. यातून एकमेकाला वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य करता येईल.
जर जमाव तुमच्यावर हल्ला करत असेल तर तुमचे स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घातक नसलेली पद्धती वापरू शकता. जर तुम्ही हिंसक जमावाच्या हल्ल्यात सापडले तर स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मात्र प्रत्येक घर, गल्ली किंवा मोहल्ला याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जावे आणि मोहल्याचे रक्षण कसे करायचे, याचा नेमका प्लॅन बनवला जावा. यामुळे कुठल्याही हिंसाचाराला तोंड देण्याकरिता आपण सदैव तयार असू.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)