पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय !

Maharashtra Police पोलिस-मित्र म्हणून काम आवश्यक

    दिनांक :22-Sep-2023
Total Views |
दखल  
- प्रवीण दीक्षित
 
Maharashtra Police देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वत:चा व राष्ट्राचा विकास करता यावा या उद्देशाने शासनाने पोलिसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामध्ये धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. Maharashtra Police अशा या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना न्यायालयामार्फत शिक्षा करणारे पोलिस दल आवश्यक आहे व ते पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. Maharashtra Police परंतु पोलिसांच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे यासाठी समाजातील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात.
 
 

Maharashtra Police 
 
 
Maharashtra Police पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वत:ची मनमानी चालू ठेवता यावी यासाठी स्वत:च्या हातचे बाहुले होऊन वागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या अनेक व्यक्ती काम करीत असतात. Maharashtra Police आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्या राजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा यासाठी ह्या पोलिस अधिकाऱ्यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणाऱ्या  अधिकाऱ्यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलिसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात. याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणाऱ्या पोलिसांवरच हल्ले करतात. Maharashtra Police गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते.
 
 
अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीर रीत्या जमवलेल्या पैशातून अनेक चित्रपट काढले आहेत; ज्यात पोलिसांचे पांडू हवालदार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो.
पोलिसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. Maharashtra Police रोज १२ तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्या वेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढावे लागतात. ह्यावरील उपाय म्हणून पोलिसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. Maharashtra Police
 
 
त्याशिवाय पोलिसांची टिंगल टवाळी करणाऱ्या चित्रपटांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलिस-मित्र म्हणून काम करणे आवश्यक आहे. गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव यासाठी पोलिसांनीही पोलिस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. Maharashtra Police लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे अतिशय आवश्यक आहे. राजकीय नेतृत्वानेही पोलिसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलिसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.
पोलिस महासंचालक(निवृत्त)