Yellow mosaic शेती निसर्गावर अवलंबून असून त्यात वेळोवेळी वेगवेगळ्या संकटांना समोर जावे लागते. चांगल्या स्थितीत असणारे सोयाबीन अचानक पिवळे व्हायला लागल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.तालुक्यात खरीप हंगामात नगदी पीक म्हणून बरेच शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. यावर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडला त्यामुळे उशीरा पेरणी करावी लागली असली तरी, उशीरा का होईना सोयाबीन उगवण चांगली झाली. डवरण, निंदण, फवारणी इ.खत मशागत करून पीक चांगले आले.
काही भागांत ऑगस्ट महिन्यात फुलोर्याने थोडा ताण दिला, पण लवकरच पावसाचे आगमन झाले. ओलिताची सोय आहे त्यांनी पाणी देऊन पिकाचे नियोजन केले. परंतु सप्टेंबर महिन्यात शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना संपूर्ण पीक पिवळे व्हायला लागल्याने शेतकर्यांची चिंता वाढली.या रोगात सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या आकारात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा र्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात.रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होऊन त्यांचा आकार लहान होतो. रोगग‘स्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाणे भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणेविरहित व पोचट होतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट होते.हा व्हायरस अल्पकाळात फार झपाट्याने वाढत असल्याने उपाययोजना करेपर्यंत पीक हातून जात असल्याने शेतकर्यांचे मोठे अर्थिक नुकसान होण्याचे चित्र आहे. मार्की, झरी, पवनार, पांढरकवडा, डोंगरगाव, अनंतपूर, मांगली या गावातील शेतकर्यांनी हा रोग सोयाबीनवर दिसत असल्याचे सांगून कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन मिळाले नसल्याने सांगितले आहे.