चिंतन
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर
Nari Shakti Vandan 2023 भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी उत्साहाने भाग घेतला. गोळी मारली आणि वेळप्रसंगी गोळी झेललीही. ब्रिटिश सरकारच्या चाबकापासून ते सायनाईड पिण्यापर्यंतचा प्रवासही त्यांनी केला. बुद्धिमत्तेपासून मुत्सद्देगिरीपर्यंत निर्भय हेरांपर्यंत स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यात समान प्रतिनिधित्व केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. Nari Shakti Vandan 2023 आपण अमेरिकेला मागे टाकून समानतेच्या पातळीवर झेप घ्यायला तयार असलो, तरी समानतेच्या स्पर्धेत महिला कधी मागे पडल्या, समानतेच्या खालच्या पायरीपर्यंत मर्यादित राहिल्या, हे आपल्या लक्षात येत नाही. नुसता मतदानाचा अधिकार देऊन पाठीवर थाप देता येणार नाही. जगातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. Nari Shakti Vandan 2023 जगभरातील संसदेत महिलांचा सहभाग २४ टक्के आहे. गंमत म्हणजे, त्यांच्या बहुतांश हक्कांसाठीचा लढा आजही भारतात सुरू आहे. अर्ध्या लोकसंख्येला उरलेल्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे; ज्यासाठी त्याचा प्रदीर्घ लढा अद्याप बाकी आहे. Nari Shakti Vandan 2023 तथापि, भारत सरकारने ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणून हा लढा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने हा कायदा लवकरच अमलात येईल आणि महिला सक्षमीकरणाचा मार्ग बळकट करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

भारताचा गौरवशाली इतिहास सिद्ध करतो की, ज्या काळात इतर संस्कृती विकासासाठी धडपडत होत्या, त्या काळात भारत ही संपूर्ण विकसित नागरी संस्कृतींपैकी एक होती. Nari Shakti Vandan 2023 सिंधू संस्कृतीतील रस्ते, उद्योग आणि शहरे हा आजही जगातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय आहे. त्यावेळी आपली सभ्यता मातृसत्ताक होती आणि आपली संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ होती. प्रदीर्घ संघर्षानंतर महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पोहोचले आहे. याचे कायद्यात रूपांतर झाल्यास हा सर्व स्त्रीशक्तीचा विजय ठरेल. महिला आरक्षण विधेयक १९९६ नंतर अनेकदा चर्चेचा मुद्दा बनले आणि २०१० मध्ये राज्यसभेत मंजूर होऊनही ते लोकसभेत मांडता आले नाही. त्यामुळे हे विधेयक रखडले होते. असे म्हटले जाते की, १९३१ मध्ये सरोजिनी नायडू यांनी सर्वप्रथम ब्रिटिश पंतप्रधानांना महिला अधिकारांच्या मुद्यांवर पत्र लिहून महिलांच्या राजकीय अधिकारांबद्दल भूमिका मांडली होती. त्यांच्या मते, महिलांना कोणत्याही पदावर उमेदवारी देणे हा एक प्रकारचा अपमान आहे. Nari Shakti Vandan 2023 महिलांनी उमेदवारी नको तर निवडून यावे, अशी त्यांची इच्छा होती. सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्याच्या १७ वर्षांपूर्वी उचललेल्या या पावलामुळे आगामी काळात महिला आरक्षणाबाबत चर्चेला उधाण आले आहे.
सध्या लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ७८ महिला आहेत जे १५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्याचवेळी राज्यसभेत १४ टक्के महिला सदस्य आहेत. राज्याच्या विधानसभांमध्ये ही संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. Nari Shakti Vandan 2023 १९५२ मध्ये देशातील पहिल्या लोकसभेत ही टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा कमी होती; जेव्हा फक्त २४ महिला खासदारांचा समावेश होता. प्रश्नांची सोडवणूक करण्यात महिला स्वत: सहभागी झाल्याशिवाय महिलांशी संबंधित प्रश्न सुटणे शक्य नाही. महिला सक्षमीकरणाची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे देशातील पंचायतींपेक्षा व्यतिरिक्त काय असू शकते? आकडेवारीवर विश्वास ठेवला तर जागतिक राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व २४ टक्के खासदार आहे. Nari Shakti Vandan 2023 महिला आरक्षण विधेयकाकडे महिलांशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले पाहिजे. ज्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी; जेणेकरून महिला सक्षमीकरणाच्या मार्गात सकारात्मक ऊर्जा पसरू शकेल. देशातील जनतेला हे विधेयक आणि त्याची गरज माहीत असून सरकार गंभीर असेल तर त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे.
Nari Shakti Vandan 2023 आता दोन्ही सदनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून जवळपास सर्वच खासदारांचा पाqठबा असल्याने पुढील लोकसभेत (२०२९) महिला खासदारांची संख्या किमान १८२ असेल. सीमांकनानंतर त्यात वाढही होऊ शकते. आपल्या संसदेत आणि विधानसभांमध्ये ते कधीच १५ टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते. पाकिस्तान (२० टक्के), नेपाळ (२१ टक्के) आणि बांगलादेश (३३ टक्के) मध्येही महिला खासदारांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. जागतिक सरासरीदेखील २४ टक्के आहे. जागतिक क्रमवारीत भारत १४१ व्या क्रमांकावर आहे. Nari Shakti Vandan 2023 म्हणजे १४० देश महिलांना निवडून देण्यात आपल्यापेक्षा पुढे आहेत. सर्वच पक्षांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे, पण फक्त तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचा अपवाद वगळता त्यांनी स्वत: कधीही त्यांच्या पक्षातील ३३ टक्के महिलांना तिकीट दिलेले नाही. लोकसंख्येच्या आधारावर जागा मिळविण्यात उत्तर भारताचे वर्चस्व असल्याने सीमांकन हे मोठे आव्हान ठरू शकते. दक्षिणेत शिक्षण आणि कुटुंब नियोजनाचा अवलंब केल्यानंतर लोकसंख्येवर नियंत्रण आले. उत्तर भारतातील लोकसंख्या वाढत आहे. Nari Shakti Vandan 2023 १९७१ च्या जनगणनेनंतर लोकसभा सदस्यांची संख्या ५४३ होती. अधिक लोकसंख्येमुळे अधिक जागांच्या फॉर्म्युल्याला दक्षिणेचा आक्षेप आहे.
पुढील दोन वर्षांत जनगणना प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर सीमांकन झाले तरच २०२९ च्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढू शकेल. भारतीय जनता पक्षाचा हा मास्टर स्ट्रोक म्हटला पाहिजे. कारण २०२४ च्याच नव्हे, तर २०२९ व्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी महिला मतदारांना स्वतःशी जोडले आहे. Nari Shakti Vandan 2023 हे खरे आहे की, १९ व्या लोकसभेसाठी पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले आणि भाजपच्या यशाचे हे प्रमुख कारण आहे. जवळपास तीन दशकांपासून रखडलेल्या या विधेयकाला ग्राह्य धरण्याच्या प्रयत्नांवर जनतेची करडी नजर असेल. स्त्रीशक्तीने असे सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे की, जे पक्ष आतून विरोध करीत होते तेही आता समर्थनात उतरले आहेत. जवळपास तीन दशकांपासून, देशाने पंचायत आणि शहरी संस्थांमध्ये ऐतिहासिक ३३ टक्के महिला आरक्षणदेखील पाहिले आहे. Nari Shakti Vandan 2023 महिलांचे यजमानच सरपंच किंवा प्रमुख बनून कारभार चालवायचे; कारण आपला समाज पुरुषप्रधान असल्यामुळे. एक स्त्री बेड्या तोडून तिची घटनात्मक ताकद कशी ओळखते, हे पाहण्यासाठी नीना गुप्ता आणि रघुवीर यादव यांची ‘पंचायत' ही वेबसीरिज पाहिली पाहिजे. Nari Shakti Vandan 2023 ‘कोट्यातील कोट्या'बाबतही गदारोळ सुरू आहे. महिलांमध्येही पक्षप्रमुख मागासवर्गीय महिलांच्या आरक्षणाबाबत बोलत आहेत.
ओबीसी कोट्याचा समावेश करण्याची विनंती आहे. जुन्या विधेयकात हे मुद्दे नव्हते. सगळे पक्ष एकमत कसे करतात हे पाहायचे आहे. भारतीय जनता पक्ष सध्या संसदेत ज्या ताकदीने आहे, ते पाहता ते यावेळी सर्व काही करू शकले असते. Nari Shakti Vandan 2023 महिला मतदार आता मोठी भूमिका बजावणार आहेत. नव्या युगात लोकशाहीची जननी म्हणवल्या जाणाऱ्या भारताच्या संसदेत आपल्या मुली अधिकाधिक सहभागी होतील. हेतू आणि इव्हेंट मॅनेजमेंट यातील सूक्ष्म फरक समजून घेण्यासाठी त्यांना सतर्क राहावे लागेल, हे पुन्हा सांगणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भावनांचा उपयोग निवडणुकीतील अडसर ओलांडण्यासाठी होऊ शकला नाही. महिलांचा आवाज लोकशाहीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचविणाऱ्या आणि पक्षाची सावली न बनणाऱ्या महिलांनाच निवडून द्यावे. Nari Shakti Vandan 2023 नव्या संसदेत सोनिया गांधींनी अगदी रास्त आग्रह केला, ‘महिलांचे बलिदान, महिलांचा सन्मान आणि महिलांचा संयम लक्षात घेऊनच आपण मानवतेच्या कसोटीवर उतरू शकतो. नारी शक्ती वंदन कायदा हीच नेत्यांची खरी कसोटी असून महिला सक्षमीकरणाचा राजमार्ग आहे.