Maharashtra महाराष्ट्र दुष्काळी संकटाच्या सावटाखाली आहे. राज्यात यावर्षी फार कमी पाऊस पडला. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर, पाणीटंचाईच्या झळा जास्त तीव‘ झालेल्या बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्यात सध्याच्या स्थितीत कमी पाणीसाठा आहे. अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. याशिवाय पाऊस नसल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पावसाच्या कमतरेचा राज्यातील एक तृतीयांश पिकांवर परिणाम झाला आहे. Maharashtra राज्यातील 2579 महसूल मंडळांपैकी 446 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा कमी पाऊस पडला आहे तर, 608 महसूल मंडळांमध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस नाही, असे कृषी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.