रायसेन,
India first solar city : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतातील पहिले सौर ऊर्जा शहर म्हणून रायसेन जिल्ह्यातील सांची नगर या जागतिक वारसा शहराचे उद्घाटन केले. समारंभात, अक्षय ऊर्जा विभाग आणि आयआयटी कानपूर यांच्यात सांचीला निव्वळ शून्य शहर बनवण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा संवर्धनाची घेतलेली प्रतिज्ञा आणि त्यांनी सामाजिक जबाबदारी समजून, या क्षेत्रात काम करण्याचा दिलेला मंत्र पूर्ण करण्याच्या दिशेने मध्य प्रदेश पुढे सरसावला आहे.
मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की, 'मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे धरणाच्या पृष्ठभागावर (India first solar city) सौर पॅनेल बसवून 600 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. एकेकाळी सांचीतून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश पोहोचला होता. आता सांची हे सौरऊर्जेच्या क्षेत्रात आघाडीचे शहर बनेल. सीएम शिवराज म्हणाले की, कोळसा आणि इतर स्त्रोतांपासून वीज निर्मितीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. 'सांचीचे नागरिक, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि सर्व शास्त्रज्ञांनी पारंपारिक मार्ग सोडून निसर्गाला हानी न पोहोचवता सौरऊर्जा निर्मिती सुरू केल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे.
सांची जवळ नागझरी येथे तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पामुळे सांची सोलर सिटीची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या काळात गुळगावमध्ये पाच मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून तो कृषी क्षेत्राची ऊर्जेची गरज भागवेल. सीएम शिवराज सिंह चौहान म्हणाले की सांचीमधील सुमारे 7000 रहिवाशांनी सौर स्टँड दिवे, (India first solar city) सौर अभ्यास दिवे आणि सौर दिवे वापरून त्यांच्या घरात वीज वाचवण्याचे वचन दिले आहे. सांची सोलर सिटी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन वार्षिक 14 हजार टनांनी कमी करेल, जे 2 लाख 38 हजारांपेक्षा जास्त झाडांच्या समतुल्य आहे, असे ऊर्जा विभागाने सांगितले. पर्यावरणपूरक सुविधांमुळे पर्यावरणाचे प्रदूषण रोखले जाईल. ई-वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. चार व्यावसायिक चार्जिंग पॉइंट आणि तीन ई-रिक्षा चार्जिंग पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. बॅटरीवर चालणारी वाहने 9 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या डिझेलचीही बचत होणार आहे.