रस्ते अपघात कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

16 Jan 2024 20:27:16
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Chandrapur district accident : सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य केले असून, चंद्रपूर जिल्ह्याने रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी करण्यात राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. मुंबई शहर आणि उपनगर प्रथम, तर नवी मुंबई तिसर्‍या क्रमांकावर आहे. Chandrapur district accident चंद्रपूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 840 रस्ते अपघातात एकूण 434 मृत्यू, तर सन 2023 मध्ये एकूण 791 रस्ते अपघातात एकूण 349 मृत्यू झालेत. सन 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 49 अपघात कमी आणि 85 मृत्यू कमी करण्यात यश आले आहे.
 
Chandrapur district accident
 
जिल्ह्याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविल्या आहेत. नागरिकांनीसुद्धा वाहतूक नियमांचे पालन केल्याने Chandrapur district accident चंद्रपूर जिल्ह्याला हा सन्मान मिळाला आहे, असे मत परदेशी यांनी व्यक्त केले. तर सन 2023 मध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व समिती सदस्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले असून, हा संपूर्ण चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सन्मान आहे, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे.
 
 
मोटर वाहन कायद्यातंर्गत कार्यवाही
मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे केलेल्या कार्यवाहीत 2 हजार 373 प्रकरणात 2 कोटी 25 लक्ष 30 हजार इतका दंड आकारण्यात आला. रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे करून ठेवणार्‍या वाहन संदर्भात सन 2023 मध्ये एकूण 2 हजार 643 वाहनांवर कलम 283 भांदविप्रमाणे तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणार्‍या 117 वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. Chandrapur district accident जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र अधिक प्रमाणात असून, कोळसा तसेच इतर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने वाहनावर ताडपत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे. यासाठी स्वतंत्र मोहीम राबवून 1 हजार 302 केसेस करण्यात आल्या. 31 डिसेंबर 2022 व 23 अपघात मुक्त ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबवून प्रभावी त्रिसूत्री मोहीम राबविण्यात आली. परिणामी दोन्ही वर्षी अपघात मुक्त 31 डिसेंबर ठेवण्यात यश प्राप्त झाले.
Powered By Sangraha 9.0