मातोरी ते मुंबई व्हाया अंतरवाली सराटी !

24 Jan 2024 17:50:58
मुंबई, 
 
who is Manoj Jarange Patil महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचं नेतृत्व करून, प्रसिद्धीच्या झोतात आलेले मनोज जरांगे पाटील ! साधारण वर्षभरापूर्वी पर्यंत त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. who is Manoj Jarange Patil महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या आंदोलनाचं नेतृत्व अनेकांनी केलं असलं तरी सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील !who is Manoj Jarange Patil
 
 

who is Manoj Jarange Patil 
 
 
मनोज जरांगे पाटील म्हणताच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीचं नाव येतं आणि तेच त्यांचं मूळ गाव आहे, असंही अनेकांना वाटतं. पण, मातोरी हे जरांगेचं मूळ गाव आहे. who is Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या मातोरी या गावी झाला. नंतर ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरमध्ये राहू लागले. जरांगे पाटील यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण मातोरीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर, गढी गेवराईमध्ये त्यांनी बारावी केलं. त्यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुलं, आई-वडील आणि चार भाऊ आहेत. या कुटुंबाची गावात शेती आहे. who is Manoj Jarange Patil असं म्हणतात की, बारावीत असतानाच मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्याचा मुद्दा त्यांच्या मनात रुजला होता. मनोज जरांगे पाटील यांचं नाव आज चर्चेत आलं असलं तरी मराठा आरक्षणासाठीचं त्यांचं आंदोलन २०११ पासून सुरू आहे. गाव पातळीवरून सुरू झालेलं हे आंदोलन आज राज्यातील सर्वात मोठ्या आणि अभूतपूर्व मराठा आंदोलनापर्यंत येऊन पोहोचलं आहे. who is Manoj Jarange Patil दरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी आर्थिक गरजा भागवण्यासाठी हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणीही कामं केलीत. मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या उपोषणाचा किस्साही रोमांचक आहे. त्यांनी पहिलं आंदोलन हे अंबड तालुक्यात असलेल्या शहागड इथे उड्डाणपुलावर केलं होतं. जवळपास सहा दिवस ते चाललं आणि जरांगेंना कळीचा मुद्दा लक्षात आला. अशा प्रकारच्या आंदोलनांना प्रशासन, नेते मंडळी घाबरतात हे जरांगेंच्या लक्षात आलं.
 
 
who is Manoj Jarange Patil तेव्हापासूनच मनोज जरांगे अशी आंदोलनं वारंवार करू लागले. २०१३ मध्ये त्यांनी काढलेला मोर्चा गाजला. ग्रामीण भागातील तरुण हजारोंच्या संख्येत मोर्चात सहभागी झाले. या मोर्चामध्ये सुमारे ३,४०० गाड्या भरून ४० हजारांवर तरुण स्वतःच्या खर्चानं सहभागी झाले होते. त्यांच्या मते, ४० हजारांच्या आसपास तरुण आरक्षणासाठीच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कुणाचंही नेतृत्व नसलेला असा हा मोर्चा होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कुठल्या कार्यालयात निवेदन द्यायचं आहे याचीही माहिती नव्हती. who is Manoj Jarange Patil लोकांना विचारून ते संबंधित ठिकाणी पोहोचले. पण त्यामागची आरक्षणाची भावना अत्यंत महत्त्वाची होती, असं जरांगे म्हणतात. कोरोनाच्या काळात म्हणजे २०२१ मध्ये साष्ट पिंपळगाव याठिकाणी झालेल्या आंदोलनापासून मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या आंदोलनाला खरी चालना मिळाली. हे आंदोलन साडेतीन महिने चाललं. जरांगे पाटलांनी गोरीगंधारी, भांबेरी अशा ठिकाणीही आंदोलनं केली पण, त्यापैकी काही वेगळ्या मागण्यांसाठीही होती. who is Manoj Jarange Patil साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
 
मराठा आरक्षणाचा मुद्दा तडीस लावण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करण्यासाठी पाटलांनी तब्बल १२३ गावांना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र केलं. who is Manoj Jarange Patil त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि आज पाटील मुंबईकडे निघाले आहेत. काही वृत्तानुसार, जरांगेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. जेम्स लेन प्रकरणानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचंही बोललं जातं. सध्याच्या काळातही कोणत्याही स्थितीत राजकारणात जाणार नाही, अशीच भूमिका ते मांडतात. जरांगे यांच्या आंदोलनात कुटुंबीयांचा सहभाग नाही. कुटुंबीयांना पाहिल्यानं भावनिक होऊन बळ कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळं कुटुंबीयांना ते सोबत नेत नाही. who is Manoj Jarange Patil आंतरवाली सराटीमध्ये २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केल्यापासून ते घरी गेलेले नाहीत. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय घराचा उंबरा ओलांडणार नाही, असा त्यांचा निर्धारच आहे.
Powered By Sangraha 9.0