धनबाद,
Mauni Mata अयोध्येत २२ जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर झारखंडमधील ८५ वर्षीय वृद्धा तीन दशकांनंतर Mauni Mata मौन व्रत तोडणार आहे. राम मंदिर व्हावे, असे स्वप्न तिने पाहिले होते. त्यासाठी तीन दशकांपासून या महिलेने मौन व्रत धारण केले होते.
Mauni Mata सरस्वती देवी असे या महिलेचे नाव आहे. वादग्रस्त ढाचा पाडला, त्यावेळी म्हणजे १९९२ मध्ये तिने राम मंदिर होईल, त्याचवेळी मौत व्रत तोडेल, असा प्रण केला होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. सरस्वती देवींना अयोध्येत मौनी माता म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील सदस्यांसोबत त्या केवळ खाणाखुणांनीच संवाद साधतात. कठीण वाक्य असतील, तर लिहून सांगतात. त्यांनी मौन व्रत धारण केले असले, तरी २०२० पर्यंत त्या दुपारी एक तासभर बोलायच्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केल्यानंतर त्यांनी संपूर्ण मौन व्रत धारण केले. Mauni Mata वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला, त्या दिवशी अयोध्येत राम मंदिर होईपर्यंत मौन व्रत धारण करेल, असे व्रत माझ्या आईने घेतले. प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यापासून ती आनंदी आहे. धनबाद रेल्वे स्थानकावरून गंगा-सतलज एक्सप्रेसने ती सोमवारी रात्री अयोध्येला रवाना झाली, असे सरस्वती देवी यांचा धाकटा मुलगा हरे राम अग्रवाल यांनी सांगितले.
Mauni Mata महंत नृत्य गोपाल दास यांच्या शिष्यांनी त्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. सरस्वती देवी यांना चार मुले आणि चार मुली आहेत. त्यांचे पती देवकीनंदन अग्रवाल यांचे १९८६ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी स्वतःला रामभक्तीत झोकून दिले. त्यांचा बहुतांश वेळ तीर्थयात्रेतच जातो, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.