वेध
- विजय निचकवडे
boycott maldives भारत माझा देश आहे आणि माझ्या देशाचा मला अभिमान आहे, हे आम्ही अगदी शाळेत पहिले पाऊल ठेवल्यापासून ऐकत आलो आहोत. हा अभिमान किती लोकांना असतो, किती लोकांच्या कृतीतून तो दिसतो, हे सांगणे कठीण आहे. boycott maldives कारण आजही काहींकडून देशाचे नेतृत्व करण्याच्या अपेक्षा केल्या जातात, पण असे लोक परदेशात जाऊन देशाविषयी अपमानच बरळतात. अशावेळी मालदीव विषयावर देशात तयार झालेले वातावरण खऱ्या अर्थाने ‘मला माझ्या देशाचा अभिमान आहे...' हे सांगणारे आहे. एवढ्या संघटितपणे आपल्या देशाच्या पाठीशी राहून कुणाचातरी विरोध करण्याचे धाडस जेथे येते, तेथे देशाची सकारात्मकतेची वाटचाल अनुभवली जाऊ शकते. कधी काळी भारताकडे पाहण्याची अनेकांची दृष्टी वेगळी होती. देशातील नागरिकांमध्येही देशाबद्दल अभिमान किती दिसून येत होता, हा प्रश्नच आहे. boycott maldives परंतु, मागील काही वर्षांत देशाची जागतिक स्तरावर तयार झालेली प्रतिमा आज देशातील नागरिकांचाही ऊर अभिमानाने भरून टाकणारी आहे. नेतृत्व बदलले आणि ते खंबीर असले की, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, हेच मागच्या काही वर्षांत आपण अनुभवले असेल. boycott maldives ज्या देशांनी भारताला कधीकाळी कवडीमोल समजले होते, आज तेच अमेरिकेसारखे देश भारताच्या पंतप्रधानांसाठी पायघड्या टाकतात, हे काही कमी नव्हे.

देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती जशी असेल मग तशीच देशातील जनताही तयार होते. आज व्यक्ती कोण, पंतप्रधान म्हणून त्या पदाचा जो गौरव देशभर होत आहे, त्यातच त्या व्यक्तीचे सामर्थ्यही दिसून येते. आज देश बदलतो आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर देशाचे महत्त्व वाढले आहे. यातून आज जागा झालेला स्वाभिमान पुन्हा एकदा दिसून आला. boycott maldives देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवमधील तीन मंत्र्यांनी अवमान केला. त्यानंतर तयार झालेले वातावरण बरेच काही सांगून गेले. पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान, याच जाणिवेतून ‘मालदीव बहिष्कारा'ची लाट आली आणि आज मालदीव येथील पर्यटनस्थळांवर बहिष्कार टाकून अनेक सहली रद्द केल्या गेल्या आहेत. boycott maldives १० हजार हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले असून विमानाची साडेपाच हजार तिकिटे रद्द केली गेली आहेत. इंडियन मर्चंट चेंबर या देशातील आघाडीच्या व्यावसायिकांच्या संघटनेने आवाहन केले आणि त्याला तेवढाच प्रतिसादही मिळाला. मालदीवसाठीचे सर्व बुकिंग लक्षद्वीपकडे वळविण्याचे आवाहनही करण्यात आले. पर्यटनाचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या काही कंपन्यांनी मालदीवचे बुकिंग बंद केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्यांदाच कठोर भूमिका घेतल्याचे अनुभवास येत आहे.
boycott maldives आजही देशाबद्दल आणि देशातील सर्वोच्च पदाबद्दल लोकांच्या मनात अभिमान कायम आहे, हे यातून स्पष्ट होते. या निर्णयामुळे कदाचित कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असेल. अनेकांची हौस आणि आनंद हिरावला गेला असेल, पण त्यापेक्षाही या लोकांना देशाचा, पंतप्रधानांचा सन्मान महत्त्वाचा आहे, हेच ही गोष्ट सांगून जाते. आज ज्या देशात राहतो, जिथे घडतो आणि ज्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याचे स्वप्न पाहतो, अशा देशाचा परदेशात जाऊन अपमान करणाऱ्यांसाठी मालदीवचा बहिष्कार कदाचित डोळ्यात अंजन घालणारा आणि खूप काही शिकवून जाणारा आहे. boycott maldives केवळ राजकारण करण्यासाठी देशाची इज्जत पणाला लावण्याची मानसिकता ठेवून वावरणाऱ्या अनेकांनी या विषयावर बोलण्याची गरज आहे. नाहीतर त्यांच्या मनातील देशाबद्दलचे बेगडी प्रेम न समजण्याइतपत जनता अज्ञानी राहिलेली नाही. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाभिमान जागविण्याचे काम आज होत आहे. यातून आलेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून याकडे पाहता येईल. boycott maldives मात्र, मागील काही दिवसांतील जगात वाढलेली देशाची ताकद आज लोकांना अपमान करणाऱ्यांना धडा शिकविण्याची शक्ती देऊन जाते, यात कुणालाही शंका नसावी.
९७६३७१३४१७