संघटित शक्तीचे जागरण हा संघाचा उद्देश!

06 Oct 2024 13:46:05
नागपूर, 
Vijayadasami festival : देशभक्त व चारित्र्यवान नागरिक तयार करणे, संघटित शक्तीचे जागरण हा रा.स्व. संघाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन महानगर सहशारीरिक प्रमुख प्रसाद शिंगेवार यांनी केले.
 हेही वाचा : जगप्रसिद्ध 'रतौल' कोणाचा ...भारत की पाकिस्तान ?
 
6534
 
 
रा. स्व. संघाचा सोमलवाडा भागातील बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उज्ज्वलनगरातील श्रीराम मंदिर संघस्थानावर उत्साहात झाला. प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. सुजाता देशमुख प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्यासह सोमलवाडा भाग कार्यवाह धनंजय कारखानीस व्यासपीठावर उपस्थित होते. विजयादशमीचे महत्त्व सांगून प्रमुख वक्ते प्रसाद शिंगेवार म्हणाले की, बाल-गोपालांना एकत्रित करून आणि देशभक्त व चारित्र्यसंपन्न नागरिक तयार करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापनाही याच दिवशी नागपुरात केली.
 
 
 
१९२५ मध्ये मोहितेंच्या वाड्यात ही संघाची शाखा सुरू झाली. संघाच्या शाखेत रोजच्या एका तासाची एक अभिनव कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी समाजापुढे ठेवली. देशभरात ७० हजार ठिकाणी रोज एक तास १० लाखांहून अधिक स्वयंसेवक एकत्र येत असतात. खेळ, शारीरिक व बौद्धिक या तीनही गोष्टींचा विकास करण्यासाठी, संघटित शक्तीचे जागरण करण्यासाठी ते एकत्र येत असतात. केवळ हेच नाही तर १ लाख ३० हजार सेवाकार्यात स्वयंसेवक सहभागी असतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी बाल व शिशू स्वयंसेवकांनी या परिसरात पथ संचलन केले. शिशू स्वयंसेवकानी रूमाल योग, बाल स्वयंसेवकांनी नियुद्ध, दंड प्रयोग, सांघिक समता, दंड व्यायाम योग आदींची प्रात्यक्षिके सादर केली. त्यातून शरीराची लवचिकता, एकाग्रता, चपळता, सांघिकता, शिथिलता आदींचे दर्शन घडवले.
 
 
मोबाईलचे अतिवेड म्हणजे ‘डिजिटल पॉयझन' असून त्यातून मुलांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी डिजीटल उपवास म्हणजे मोबाईलचा कमी वापर, व्यवस्थित आहार (पॅकेज फुड टाळून सकस अन्ने), ध्यान-धारणा, नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, घराबाहेर पडताना आई-वडील, ज्येष्ठांना वाकून नमस्कार, हे पाच संकल्प करण्याचे आवाहन डॉ. सुजाता देशमुख यांनी केले.
Powered By Sangraha 9.0