जनजाती समाज भारताचे गौरव

26 Dec 2024 19:58:33
नागपूर,
Girish Kuber : गावात, पाड्यात, वाडी-वस्तीत, डोंगर-दर्‍यांत राहणार्‍या जनजाती समाज बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा कायम राखली आहेत. दुर्गम भागात राहून आपल्या धर्म-संस्कृतीचे जतन करणारा हा जनजाती समाज भारताचे गौरव असल्याचे स्पष्ट प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाचे अ. भा. अधिकारी गिरीश कुबेर यांनी केले.
 
 
 
26dec2843
 
 
 
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास वनवासी कल्याण आश्रम स्थापनादिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष तसेच महू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदास आत्राम, विदर्भ वनवासी कल्याण आश्राम, नागपूरच्या अध्यक्षा डॉ. शेरील पडोळे, रायसोनी फाउंडेशनच्या संचालक डॉ. मृणालिणी नाईक उपस्थिती होते.
 
आदिवासी समाजाला विश्वास घेत प्रकल्पाच्या माध्यमातून मदतीचा हात देत त्यांना समाजाच्या विकसित प्रवाहात सामावून घेण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम अहोरात्र काम करत आहे. समाजाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या जनजाती समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आला आहे. त्यांच्या हिताचे रक्षणासाठी सर्वांचा हातभार आवश्यक असल्याचे गिरीश कुबेर यांनी सांगितले.
 
 
प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुरस्कार
 
 
विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण प्रसंगी विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यात प्रामुख्याने गट - अ मध्ये प्रथम - दिपा अंकुरवार, व्दितीय - श्रीकृष्ण स्वाईन, तृतीय - मृणाली पाटील, तर गट- ब मध्ये प्रथम - अन्वेश खोब्रागडे, व्दितीय - श्रावणी पांडे, - तृतीय - इश्वरी चरडे याशिवाय प्रोत्साहन पुरस्कार - पाटील, शरवरी गोळे, विभोर रंगारी, गीता पराते, आयुष कोरेटी, प्रोत्साहन पुरस्कार - प्रणव बिस्वास, समृध्दी पथाडे, अर्णव ढोंगे, मोहीत हेडावू, क्षितिज कोवे यांना रोख पुस्कार देण्यात आले.
 
 
कार्यक्रमाचे संचालन फिरोज उईके यांनी केले तर आभार सुचिता देशपांडे यांन मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत कोठारकर, श्रीकांत चांदपूरकर, पंकज पत्की, शिक्षा आयाम वैशाली बोपर्डीकर आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0