तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Scout-guide उत्तमरित्या जीवन जगण्यासाठी बलशाही राष्ट्र व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी स्काऊट गाईडसारख्या चळवळीची आज गरज आहे, असे प्रतिपादन श्री. संत उध्दव बाबा संस्थान मानकी आंबा दारव्ह्याचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांनी केले. मानकी आंबा येथील संत उद्धवबाबा संस्थानच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा मेळाव्याचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून पवन जयस्वाल बोलत होते.

यावेळी सुनीता जयस्वाल, मित जयस्वाल, मानकी संस्थान उपाध्यक्ष साहेबराव सरोदे, मंदिराचे पुजारी देवानंद महाराज, उपसरपंच निलेश राऊत, जिल्हा चिटणीस तथा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, प्राचार्य सुनील निमकर, मेळावा प्रमुख सुरेश निमकर, सातारा येथील स्काऊट मास्टर सुरेश चव्हाण, कब मास्टर दिनेश घाटोळ, ज्येष्ठ स्काऊटर महादेव गिरूळकर, पुंडलिक उबाळे, नरेंद्र भांडारकर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सुरेखा टोणे, ज्येष्ठ गाईडर कल्पना देशमुख, सीमा पापळकर, मुख्यध्यापक कल्पना धवने उपस्थित होते.यवतमाळ भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे या ३३ व्या स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या मेळाव्याच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध यशाबद्दल गुणवंतांना बक्षिसे प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला.
या मेळाव्यामध्ये जिल्हातील माध्यमिक शाळेतील ५०० स्काऊटस् व गाईडस्, स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन सहभागी झाले होते. मेळाव्यात स्काऊट गाईड कौशल्य स्पर्धा, तंबू निरीक्षण, बिनाभांड्याचा स्वयंपाक, पायोनिअरिंग प्रकल्प, साहसी खेळ, स्कीलो-ओ-रामा, शोभायात्रा, शेकोटी कार्यक्रम, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, तसेच लोकनृत्य, स्पर्धा व शेवटी सर्व धर्मीय प्रार्थना घेण्यात आली.
विविध स्पर्धेचे परीक्षण, दीपक बाभुळकर, नागोराव काकपुरे, देवेंद्र ताजने, हिम्मत राठोड, महादेव भालेराव, संदीप खांदवे यांनी केले. यावेळी अनेक शाळांनी विविध स्पर्धेत बक्षिसे पटकावली.Scout-guide संचालन जिल्हा संघटक मनिषा तराळे यांनी केले. आभारप्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले.या मेळाव्यासाठी प्रतिमा चौधरी, विद्यानंद कोमलवार, सूरज गोईकर, दिशा qशगारकर, साजिद मन्सुरी, अक्षय सरोदे, देवेंद्र काळे, चेतन उरकुडे, रामनाथ भोयर, पोमल चव्हाण, संस्थानचे स्वंयसेवक व गावकèयांनी परिश्रम घेतले.