गारपीटीमुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा सह रब्बी पिकांचे नुकसान

27 Feb 2024 19:33:52
मंगरुळनाथ,
crop damage : तालुयातील घोटा,शिवारात वादळ सह वारा,गारपीटीमुळे सोलर पॅनलचे नुकसान झाले असुन शिवणी,गायवळ शेवती, चकवा, पारवा, लखमापुर, बोरवा, येथे शेतकर्‍यांचे उभ्या पिकांचे नूकसान झाले आहे. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.
 
 
skfdk
 
तालुयात झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांच्या घरात येणारे पीक भुईसपाट झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे. गारपीट व पावसामुळे गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे नुकसान झालेले आहे. अचानक पावसासह झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील गहू, हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यामध्ये चिंता वाढली आहे. चांगल्या पिकाची अपेक्षा असताना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. शेतातल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
 
शेतात सध्या कापणी - मळणीची कामे सुरू असताना मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. वादळी वार्‍यासह गारपीटीमुळे गहू अक्षरशः जमिनीवर पडला असून, हाती काही लागेल न लागेल याचीसुद्धा शास्वती राहिली नाही. नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने होत आहे.
Powered By Sangraha 9.0