- गर्डरची सुरक्षा वाढविण्यासाठी दुरुस्ती
- कळंभालगत 90 किमी प्रतितास वेग मर्यादा
नागपूर,
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील Kalamba Railway कळंबा स्थानकाजवळील पुलावरील बेड ब्लॉक बदलण्याचे काम कमी वेळात पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ब्रिज गर्डरची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी रेल्वे पुलाच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ मंडळ अभियंता प्रथमेश अग्रवाल यांनी दिली.
कळंभा पुलाखाली बेड ब्लॉक बदलण्याच्या कार्यस्थळी माध्यम प्रतिनिधींचा दौरा करण्यात आला. त्याप्रसंगी रेल्वे पूलाच्या दुरुस्तीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी रेल्वेचे अभियंता ब्रजकिशोर,अनुप श्रीवास्तव, बी.ए.मिश्रा, योगेश तुरकर, विवेक वर्मा, विद्यासागर पाटील, अनुराग मिश्रा आदी उपस्थित होते.
उभ्या पूलाला भेंगा
नागपूर आमला विभागातील तीनखेडा ते कळंभा विभागादरम्यान रेल्वेच्या तपासणी पथकाला उभ्या पूलाला भेंगा दिसून आल्या होत्या. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. Kalamba Railway रेल्वे ब्रिज गर्डरच्या आवश्यक दुरुस्तीसाठी ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावून कमीतकमी वेळात हे काम पूर्ण करण्यात आले. अशाप्रकारच्या दुरुस्तीसाठी 1 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र हेच काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. रेल्वे ब्रिज गर्डर बेसच्या दुरुस्तीसाठी सावधगिरीचा उपाय म्हणून, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ट्रेनच्या कमाल वेग 130 किमी प्रतितास ऐवजी 90 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवून वेगावर निर्बंध लावण्यात आले होते.
.
दोन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण
रेल्वे पुलाच्या बेड ब्लॉक बदलण्याचे कामासाठी 9 जानेवारी 2024 रोजी कामास सुरुवात करण्यात आली होती. तर 29 फेब्रुवारी रोजी हे काम पूर्ण करण्यात आले.एक वर्षाच्या मुदतीसह हे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. रेल्वेच्या या अधिकार्यांनी अवघ्या दोन महिन्यांत पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण करुन रेल्वे वाहतूक कायम राखली. पूर्ववत केले. रेल्वे अधिकार्यांनी बेड ब्लॉक बदलण्याचे काम जलदगतीने पूर्ण करीत अवघ्या दोन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण केले.
.
सर्वच रेल्वे ब्रिजची दुरुस्ती
Kalamba Railway : रेल्वेच्या सर्व ब्रिज गर्डर बेसची संरचनात्मक अखंडता वाढवण्याच्या उद्देशाने सर्वच रेल्वे ब्रिज गर्डर बेसचे दुरुस्तीचे काम केल्या जात आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ट्रेनच्या कमाल वेग 130 किमी प्रतितास ऐवजी 90 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवून वेगावर निर्बंध लावण्यात आले होते. रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी परिश्रमपूर्वक पार पाडण्यात आल्याची माहिती नागपूर विभागाचे महाव्यवस्थापक मनिष अग्रवाल यांनी दिली.