bank installments यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु यावर्षी कापसाचा उतरता भाव व सोयाबीनला असलेला अत्यल्प भावामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान मार्च एंडिंगमुळे घेतलेले कृषी कर्ज भरण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू असून पीकांना भाव नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
अनेक शेतकर्यांनी सोयाबीन व कापसामध्ये भाव वाढ होईल या आशेने सोयाबीन व कापूस घरात ठेवले होते. मात्र आता सोयाबीन हे चार सव्वाचार हजारापर्यंत तर कापसाचा भाव सहा साडेसहा हजारापर्यंत आहेत. मागील खरीपाची सुरुवात कमी पाऊस, त्यानंतर पावसाचा खंड त्यातच विविध रोग यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न घटले. bank installments सोबतच हाती आलेले उत्पादनाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे काही शेतकर्यांनी कापूस व सोयाबीन घरातच ठेवले होते. सध्या पिकावर झालेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.