नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत पेच निर्माण झाला असून एकीकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी दावा करीत प्रचारास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवर दावा केला आहे. अशातच भाजपा नेते व राज्याचे मंत्री Girish Mahajan गिरीश महाजन यांनी दोन्ही पक्षांतील इच्छुक नेत्यांची हवा काढत नाशिक हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या जागेवरून वादविवाद नको, सांमजस्याने तोडगा काढावा आसे विधान केले आहे.
Girish Mahajan महाजन म्हणाले की, सगळ्यांनाच वाटते की, नाशिकची जागा आपल्याला मिळायला हवी. पण असे होत नाही, एकत्र राहायचे असेल तर वाद टाळायला हवे. एकमेकांविरोधात कुरघाडी करून निवडणूक जिंकता येत नाही. नाशिकमध्ये शिवसनेचे विद्यमान खासदार असल्याने तेथे पुन्हा त्यांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादीला वाटते ही जागा त्यांना मिळावी. नाशिक जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत, त्यामुळे हा भाजपाचाच बालेकिल्ला आहे. ते पुढे म्हणाले की, शेवटी महायुती आहे, जागेच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. मित्रपक्षाला काही हक्काच्या जागा द्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे.