- आमदार नितेश राणे यांचा मविआ नेत्यांना सवाल
मुंबई,
Nitesh Rane : संजय मंडलीकांनी माफी मागण्याची मागणी करणार्या मविआ नेत्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणार्या संजय राऊतांना जाब विचारला होता का, त्यांना माफी मागण्याची मागणी केली होती का, असा परखड सवाल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला. नितेश राणे यांनी पत्रपरिषद घेऊन कोल्हापूरच्या मविआ नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय मंडलिकांच्या वक्तव्यांमुळे छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कसा झाला, याबाबत आज सकाळी संजय राऊत मुक्ताफळे उधळत होते.
याच संजय राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले होते. म्हणजे, सर्वांत मोठा अपमान संजय राऊतांनीच केला होता. त्यानंतरही ते छत्रपतींना जाऊन भेटतात, त्यांना भगवी शाल घालतात, मग मविआचे कोल्हापूरचे जे नेते आहेत, जे आज संजय मंडलिकांना माफी मागायला सांगतात, तेव्हा त्यांनी संजय राऊतांना माफी मागायला का सांगितली नाही, असा सवाल Nitesh Rane नितेश राणे यांनी केला. राणे म्हणाले, छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे मागणार्या संजय राऊतांना आम्ही कोल्हापूमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, त्यांना महाराजांच्या घरात जाऊ देणार नाही, अशी भूमिका तेव्हा मविआच्या नेत्यांनी का घेतली नाही, खरंच जर तुम्ही छत्रपतींच्या गादीचा आदर करीत असाल, तर जो नियम तुम्ही संजय मंडलिकांना लावला तो संजय राऊतांना का लावला नाही?