भारतीय निवडणुकांमध्ये एआयचा वापरकरून हस्तक्षेप करण्याची चीनची योजना

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
तैवान निवडणुकीमध्ये निकालांवर प्रभाव
टाकण्यासाठी चीनचा एआय वापर
Election : चीन जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एआयद्वारे तयार केलेल्या सामग्रीचा वापर करून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. ‘स्टॉर्म 17’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या गटाकडून तैवानच्या निवडणुकांमध्ये एआयच्या मदतीने बनवलेले बनावट ऑडिओ सपोर्ट आणि मिम्स आदी सामग्री प्रसारित केली गेली. काही उमेदवारांची बदनामी करणे आणि मतदारांच्या धारणा प्रभावित करणे, हा त्या मागचा उद्देश होता. तैवानच्या निवडणुकीदरम्यान बीजिंग-गट स्टॉर्म 17 ने तैवानच्या तत्कालीन डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (DPP) चे अध्यक्षपदाचे उमेदवार विल्यम लाई यांच्या विरोधात दुष्प्रचार केला. फेब्रुवारी 22 पासून स्टॉर्म 36 ने एआय टीव्ही न्यूज अँकर तैनात केले; ज्यांनी दुष्प्रचार करण्याचा वेग वाढवला.
 

AI 
 
तैवान निवडणुकीत चीन यशस्वी झाला का?
तैवानच्या Election  निवडणुकीत चीनने केलेल्या ढवळाढवळीला किती यश मिळाले? मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, चीनला निवडणुकीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. तरीही या हस्तक्षेपाचा निवडणुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला, असे मानले जाते. चीनद्वारे तैवान निवडणुकीमध्ये हस्तक्षेप भारतासाठी एक अभ्यासाचा विषय आहे; ज्यापासून आपण खूप शिकू शकतो.
 
 
यूएस निवडणुकीमध्ये चिनी एआयचा वापर
Election  : अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने अमेरिकन निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला आहे. ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अशाच प्रकारचा आरोप चीनच्या विरोधात केला आहे. चिनी गट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेत समाजात फूट पाडणारे प्रश्न निर्माण करतात आणि मतदारांच्या मानसिकतेविषयी गुप्त माहिती गोळा करतात आणि नंतर त्या त्या भागाला अनुरूप असा दुष्प्रचार करतात. अलीकडच्या काही महिन्यांत चीनने नोव्हेंबर 22 मध्ये केंटकीमध्ये ट्रेन रुळावरून घसरणे, ऑगस्ट 22 मधील माऊ जंगलात लागलेली आग यासह अनेक विषयांवर यूएस आणि इतरत्र प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. जपानी आण्विक सांडपाण्याची विल्हेवाट, अमेरिकेतील औषधांचा गैरवापर तसेच इमिग्रेशन धोरणे आणि देशातील वांशिक तणाव असे अनेक विषय पुढे आणून मतदारात फूट पाडून चिनी समर्थक उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले. या प्रयत्नांना थोडे यश मिळाले आहे.
 
 
अमेरिकन निवडणूक प्रचारात एआयचा वापर नवीन नाही. 22 च्या न्यू हॅम्पशायर डेमोक्रॅटिक प्रायमरीत आघाडीवर, एआय-व्युत्पन्न केलेल्या फोन कॉलने अध्यक्ष जो बायडेन यांच्या आवाजाची नक्कल केली आणि मतदारांना मतदानात सहभागी होण्याविरुद्ध सल्ला दिला. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी त्यांची मते रोखून ठेवावीत,असा या कॉलने चुकीचा इशारा दिला. हा संदेश ऐकल्यानंतर अध्यक्ष बायडेन यांनी स्वत: या निर्देशाचे समर्थन केले आहे, अशी अनेक मतदारांची दिशाभूल झाली. उत्तर कोरियाच्या सहभागासह चिनी राज्य-समर्थित सायबर गट 22 मध्ये नियोजित अनेक निवडणुकांना लक्ष्य करतील, अशी अपेक्षा आहे. कारण चीनला त्या त्या देशात चिनी समर्थकांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आहे. राजकीय पक्ष चीनविरोधात आहेत, त्यांच्या विरोधात एआयच्या मदतीने दुष्प्रचार युद्ध करून त्यांना हरवायचे आहे. ‘म्हणजे तंत्रज्ञानाची महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि तैवानसारख्या देशांमध्ये चीनने एआयचा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात काही प्रमाणात यश मिळवले. ताकद एवढी मोठी असेल तर भारताला नक्कीच सावध राहावे लागेल.’
 
 
भारतीय निवडणुकांमध्ये व्यत्यय
जगभरातील Election  निवडणुकांवर प्रभाव टाकणे व भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये यंदाच्या वर्षी होणार्‍या निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून चीन हस्तक्षेप करू शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. यंदाच्या वर्षी जगभरातील किमान सहा देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि सामाजिक कारणांसाठी एआयचा वापर, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील नवकल्पना यावर चर्चा केली. मात्र, चीन एआयचा गैरवापर करत आहे.
निवडणुकांदरम्यान आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीन सोशल मीडियाद्वारे एआयने तयार केलेली दुष्प्रचार करणारी सामग्री तैनात करेल. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फसव्या आणि खोट्या सामग्रीच्या निर्मितीसाठी राजकीय जाहिरातींद्वारे उद्भवलेला धोका, ज्यामध्ये डीपफेक किंवा कधीही न घडलेल्या घटनांचा समावेश आहेत. उमेदवारांची न केलेली विधाने, विविध मुद्यांवरची त्यांच्या भूमिका आणि काही घटनांच्या सत्यतेबाबत जनतेची दिशाभूल करणे हा डावपेचाचा उद्देश आहे. यामुळे मतदारांच्या मनावर परिणाम होतो. एआय-व्युत्पन्न सामग्रीचा प्रभाव, कालांतराने अधिक प्रभावी होऊ शकतो.
 
 
भारतासाठी पुढे रस्ता
भारताच्या सार्वत्रिक Election  निवडणुका 1 एप्रिल रोजी सुरू होणार आहेत; ज्यांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांत होईल, भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) चुकीची माहिती त्वरित ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आधीच मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल जाहीर केले आहेत. भारताच्या निवडणुकात चीनची ढवळाढवळ थांबवण्याकरिता भारताने नेमकी अजून कुठली पावले उचलली पाहिजे?
 
 
चीनच्या हस्तक्षेपाचे काही संभाव्य परिणाम:
* मतदारांमध्ये गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण करणे
* विशिष्ट उमेदवारांसाठी किंवा विरोधात मतदान करण्यासाठी मतदारांना प्रभावित करणे
* निवडणुकीच्या प्रक्रियेवर अविश्वास निर्माण करणे
चीन भारताच्या निवडणुकांमध्येही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो, हे नाकारता येत नाही. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी भारताने खालील पावले उचलणे आवश्यक आहे-
* सोशल मीडियावर लक्ष ठेवणे : बनावट बातम्या, चुकीची माहिती पसरवण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत काम केले पाहिजे.
* नागरिकांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देणे : मतदारांना बनावट बातम्या आणि चुकीची माहिती ओळखण्यास आणि त्यापासून दूर राहण्यास मदत करण्यासाठी जागरूकता मोहिमा राबविणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना बनावट बातम्या आणि प्रचार ओळखण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास मदत होईल.
* सायबर सुरक्षा मजबूत करणे : सरकार निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि इतर निवडणूक संबंधित प्रणालींची सुरक्षा मजबूत करत आहे. प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा उपाययोजना अजून मजबूत केल्या पाहिजेत.
* निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता : निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष आहे, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. मतदारांना निवडणुकीवर विश्वास वाढण्यास मदत होईल आणि हस्तक्षेपाची शक्यता कमी होईल.
* निवडणूक कायद्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे : यामुळे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना वचक बसेल.
* आंतरराष्ट्रीय सहकार्य : चीनकडून होणार्‍या निवडणुकीतील हस्तक्षेपाला प्रतिबंध करण्यासाठी इतर देशांशी सहकार्य करणे आवश्यक आहे. चीनच्या हस्तक्षेपाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती देणे आवश्यक आहे. हस्तक्षेपाचा सामना करण्यासाठी इतर देशांसोबत काम करणे आवश्यक आहे.
* राजकीय पक्षांनी निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करताना अधिक पारदर्शक आणि जबाबदार असणे आवश्यक आहे.
* नागरिकांनी सोशल मीडियावर पाहिलेली माहिती तपासून आणि पुष्टी करूनच शेअर केली पाहिजे.
Election :  चीनच्या हस्तक्षेपाचा धोका गंभीर आहे आणि भारताने त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे. सरकार, राजकीय पक्ष आणि नागरिक या सर्वांनी यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे. भारताने चीनच्या हस्तक्षेपाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे; ज्यामुळे लोक बनावट बातम्या आणि प्रचारापासून सावध राहू शकतील.
- 9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)