Devendra Fadnavis इंदिरा गांधींनी भारतातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना 2 वर्षे तुरुंगात डांबून ठेवले होते.मुळात भारताच्या रक्तात लोकशाही असल्याने लोकशाही कोणीही संपवू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस क्लब येथे पत्रपरिषदेत केले.
लोकशाही धोक्यात असल्याचा दावा काँग्रेसकडून वारंवार केल्या जात आहे. मात्र अशाप्रकारचे तथ्यहीन आरोप करणे पूर्णत: मूर्खपणाचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना रद्द करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगत आहे. मात्र अग्निवीर योजना देशाच्या संरक्षणासाठी आणली असताना अशी योजना रद्द करणे म्हणजे भारताला धोक्यात घालणे होय. काँग्रेसचे आश्वासन फोल ठरले मोदींची गॅरंटी म्हणजे शंभर टक्के योजना अंमलात आणल्या जाते.आतापर्यंत छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, कर्नाटक या राज्यात काँग्रेसने दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. Devendra Fadnavis त्यामुळे काँग्रेसने दिलेले सर्वच आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे रक्षण करण्याचे कार्य गेल्या 10वर्षात केले आहे. तरी सुध्दा विरोधक संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप करीत आहे. लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून दररोज केल्या जात आहे, असे फडणवीस म्हणाले.