आज घरोघरी पोचविणार पंतप्रधानांचा नमस्कार

मुनगंटीवार यांचा वचननामाही होणार वितरित

    दिनांक :16-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Sudhir Mungantiwar 8 एप्रिलला चंद्रपुरात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी घरोघरी जावून माझा नमस्कार सांगावा, असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले होते. त्या आवाहनाला अनुसरून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील भाजपाचे बुथस्तरीय कार्यकर्ते, प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी मंगळवार, 16 एप्रिल रोजी घरोघरी जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार मतदार नागरीकांपर्यंत पोहचविणार आहेत.
 
   
Sudhir Mungantiwar
 
भारतीय जनता पार्टी हे आपले कुटूंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले कुटूंब प्रमुख आहे. बलशाली राष्ट्रनिर्माणासाठी संघर्षसिध्द असलेल्या आपल्या कुटूंब प्रमुखाचा नमस्कार भाजपाचे सच्चे सैनिक या नात्याने घरोघरी पोहचवावा, असे आवाहन उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. नमस्कार सांगताना मुनगंटीवार यांचा वचननामादेखील मतदार नागरिकांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. Sudhir Mungantiwar अशी माहिती पत्रपरिषदेत प्रमोद कडू, राहुल पावडे, सविता कांबळे, प्रज्ज्वलंत कडू आदींंनी दिली. संरक्षित स्मारकाबाबत पुरातत्व विभागाच्या परिशिषीष्ठ जे बांधकाम आहे, त्यांना संरक्षण देणार, आदिवासीच्या सांस्कृतिक वारसांचे जतन करणार तसेच ठिकठिकाणी सेवा केंद्र उघडणार, प्रत्येक गावात विकासदूत येऊन समस्यांचे निराकरण करणार, फिरते जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सेवा देणार, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणार, दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला, बचतगट यांच्यासाठी विशेष योजनांकडे प्रधान्यांने लक्ष देणार असे वचन मुनगंटीवार यांनी दिले आहे.
कृषी व वन क्षेत्रासाठी
*वर्धा नदीवर बंधारे बांधून सिंचनाची सोय करणार.
*जिवती तालुक्यात सिंचनासाठी व्यवस्था करणार.
*भाताच्या वाणांना भौगोलिक मानांकन मिळवून देणार.
*पुसा या कृषी क्षेत्रातील मोठ्या संस्थेच्या मदतीने कृषी विज्ञान केंद्रे उभारणार.
*कोल बेअरींग अ‍ॅक्ट शेतकरी व स्थानिकांच्या हिताचा कसा होईल यासाठी त्यात बदल करण्याचे प्रयत्न करणार.
*कोणत्याही प्रकल्पात शेती जात असेल तर प्रकल्पग्रस्तांना सर्वोच्च भाव मिळेल, यासाठी प्रयत्न करणार.
*जिवती येथील वन जमिनीचा प्रश्न निकाली काढणार.
*कृषी आधारित उद्योग आणून शेतकर्‍यांना बळ देणार.
*पांदन रस्ते व शेत रस्ते बांधणार.
रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधा
*मतदारासंघात आवश्यक ठिकाणी रेल्वे आरओबी आणि अंडरपास करणार.
*चंद्रपूर ते पूणे व चंद्रपूर ते मुंबई प्रवाश्यांसाठी थेट रेल्वे सुरू करणार.
*मूर्ती विमानतळ पूर्ण करणार.
*मोरवा एअरपोर्टमध्ये फ्लाईंग क्लब करणार.
*बाबूपेठ रेल्वे पुलावरील निवासी घरांचे पुनर्वसन करून ब्रीज पूर्ण करणार.
*रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार.
*चंद्रपूर शहरातून आउटर रिंगरोड करणार.
*राजुरा व मूल येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणार.
*नागपूर-चंद्रपूर मेट्रो पुढे राजुर्‍यापर्यंत वाढविणार.
*मोठ्या शहरांमध्ये शहर बस वाहतूक सुरू करणार.
*राजुरा ते समृध्दी महामार्गापर्यंत नवा महामार्ग करणार.
*नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार.
*वणी-आर्णी क्षेत्रातील ग्रामीण भागात दळणवळणासाठी पक्या रस्त्याची निर्मिती, ग्रामपंचायतींना, नगर पंचायत क्षेत्राला विकसित करणार.
*या भागात विरंगुळा केंद्र, उद्याने, उच्च दर्जाची करून गावे हरित करणार.
*गरजुंना घरकुल मिळेल यासाठी प्रयत्न करणार.
उद्योग व रोजगार क्षेत्रासाठी
*एमएसएमईच्या माध्यमातून कुटीर उद्योग उभारणार.
*वेकोलिमध्ये ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना त्याच प्रकल्पामध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देणार.
*मतदार संघात नवीन उद्योगाची निर्मिती करणार.
*वेकोलिच्या डम्पींगमध्ये जी गावे पूरग्रस्त झाली आहेत, त्या गावांसाठी विशेष योजना करणार.
*महिला बचतगटांसाठी तालुकास्तरावर विक्रीकेंद्र व स्टिचींग आणि ऐम्पायरीटी क्लस्टर उभे करणार.
*चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी ईएसआयसी हॉस्पीटल बांधणार.
*लहान उद्योगांचे क्लस्टर करणार.
*प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज देणारा कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार.
*वणी-आर्णी क्षेत्रात औद्योगिक क्षेत्र विकसित करून कापूस, सोयाबीन प्रक्रीया उद्योगाला प्राधान्य देणार.