अंनिसचे श्याम मानव लागले तुतारी फुंकायला

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
हिंगणघाट, 
Shyam Manav पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून देश मुक्त करा आणि येत्या 26 एप्रिलला तुतारीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. या सभेचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने येथील सर्व सामाजिक परीवर्तनवादी संघटना यांनी केले होते.
 

Shyam Manav 
 
प्रा. मानव हे भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयावर बोलत होते. आपल्या दीड तासाच्या भाषणातून त्यांनी भाजप सरकार व मोदी यांना चांगलेच धारेवर धरले होते. केंद्रातील मोदी सरकार हे भ्रष्ट, जात्यज्ञ, व लोकशाही विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. गोरगरीब जनतेला लुटून मोदी हे 200 करोड रुपयाच्या विमानातून फिरत असून देशाला भिकारी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. Shyam Manav प्रा. मानव यांचे व्याख्यान हे परिवर्तन चळवळ मजबूत करण्यासाठी असेल या अपेक्षेने आलेल्या अनेकांची त्यांचे राजकीय थाटात झालेल्या भाषणाने अनेकांची निराशा झाली. संपूर्ण दीड तासाच्या भाषणातून त्यांनी मनुस्मृती, ब्राह्मणी वर्ण व्यवस्था, व संविधान धोक्यात असल्याची टेप वाजवत भाजपवर कठोर शब्दात प्रहार केले.
आचारसंहितेतून वाचण्यासाठी त्यांनी महाआघाडीचे नावावर या सभेचे आयोजन न करता शहरातील दीड डझन संघटना यांचे नाव समोर करून आपला राजकीय डाव साधल्याची शहरात चर्चा होती. या सभेच्या व्यासपीठासमोर पवार गटाचे किशोर माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, अतुल वांदीले, वर्धा येथील संजय इंगळे तिगावकर, नाट्य कलावन्त हरीष इथापे इत्यादी मंडळी उपस्थित होती. संपूर्ण भाषणात टिकेचा रोख मोदी व भाजप यांच्यावरच केंद्रित करून शरद पवार, उद्धव ठाकरे केजरीवाल, व महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांची भलावणं करण्यात आली.