धार्मिक कट्टरता, सैतानी मानसिकता

    दिनांक :20-Apr-2024
Total Views |
प्रहार
- इम्तियाज महमूद
सत्तेवर इस्लामची नजर
Religious fanaticism : फिरां’प्रमाणे मुस्लिमांना शिक्षण, करीअर, पैसा, घर, खेळ इत्यादी नको असते. चांगले, दर्जेदार जीवन प्राप्त व्हावे म्हणून मुसलमान पाश्चिमात्य देशांमध्ये आलेले नाहीत. ते सत्ता काबीज करण्यासाठी आले आहेत. त्यांना संपूर्ण जगात, प्रत्येक देशात सत्ता हवी आहे. आयत 4.144 नुसार काफिरांशी शांती, सामंजस्याने राहणार्‍या श्रद्धावानांना अल्ला कठोर शिक्षा करण्याचा इशारा देतो आणि मुसलमान या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतात. सर्वसाधारण मुस्लिमांच्या मन व मेंदूवर त्यांच्या नेत्यांचे पूर्ण नियंत्रण राहते.
 
 
Taliban-1
 
Religious fanaticism : नैतिक मार्गदर्शन, दिशा-निर्देश विकसित करण्यासाठी आवश्यक प्रौढ चेतना जागृत करण्याची मुस्लिमांना कधी परवानगीच दिली जात नाही. त्यांना या प्रकरणात कधी पर्याय दिला गेला नाही. जर जिहादमध्ये सामील होण्यास संपर्क साधल्यानंतर कोणी त्याला नकार दिला तर त्याला ठार मारले जाते. म्हणूनच अमेरिकेने आर्थिक व साधनसामुग्री स्वरूपात मदतीचा वर्षाव करूनही अफगाणिस्तानसारख्या देशातील लोक अमेरिकेऐवजी तालिबानची निवड का करतात हे यावरून स्पष्ट होते. जो कोणी मुसलमान या सर्व अनिष्ट गोष्टी दूर सारण्याचा प्रयत्न करतो, काही चांगले करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ठार मारले जाते.
 
 
London-Muslim
 
पाकिस्तानी राजकारणी सलमान तासीर यांनी पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्याला विरोध केला तेव्हा त्यांच्या अंगरक्षकाने त्यांची हत्या केली. जर पाश्चिमात्य देशांना असे वाटत असेल की आपली समृद्धी किंवा औदार्य यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान अथवा अन्य मुस्लिम देशातील लोकांचे मनपरिवर्तन होईल, ते सहिष्णू होतील तर ते चुकीचे आहे. याउलट हे इस्लामी अनुयायी कट्टरवादाचा मार्ग चोखाळण्याची अधिक शक्यता आहेत. अनेक जहाल इस्लामवाद्यांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे, ही वस्तुस्थिती आहे. इस्लाम आता पाश्चिमात्य काफिरांच्या मनात भीती निर्माण करेल. पाकिस्तानी लष्कराचे ब्रिगेडियर एस. मलिक यांनी आपल्या ‘द कुरानिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर’ या पुस्तकात लिहिले आहे की, काफिरांनी शरणागती पत्करावी म्हणून दहशत पसरवली जाते. दहशतवाद हे शत्रूवर निर्णय लादण्याचे साधन नाही. आम्हाला दहशतवादावर नियंत्रण मिळवावे लागेल.
 
 
Religious fanaticism : धिम्मी (अरबी) अथवा जिम्मी (उर्दू) (शरीयत कायद्यानुसार चालणार्‍या मुस्लिम देशातील दुय्यम दर्जाचे गैरमुस्लिम नागरिक) लोकांना त्यांचा आत्मा, नशीब आणि इच्छा मारण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या जीवनातील प्रेम, नेतृत्व आणि आदर मारले गेले पाहिजे. जोपर्यंत ते पूर्णपणे शरणागती पत्करत नाही तोपर्यंत त्यांच्यावर ओझे टाकायचे आहे. यानंतर त्यांना काहीही असह्य होणार नाही. ते वशीकरण किंवा पराक्रमाविषयी उदासीन राहतील. त्यांच्यासाठी गरिबी आणि श्रीमंती सारखीच असेल, स्तुती आणि अपमान सारखाच असेल, रोखणे आणि सोडणे समान असेल, गमावणे आणि मिळवणे सारखेच असेल. मग, जेव्हा सर्व गोष्टी समान, सारख्या असतील, तेव्हा ते (आत्मे) विनम्र होतील आणि त्यांनी जे द्यायला हवे ते स्वेच्छेने देतील. (तफसीर इब्न अजिबा, कुराणातील आयत (श्लोक) क्र. 9:29)
 
 
ही (अहमद इब्न मुहम्मद इब्न अजिबा) अशी दुर्दशा आहे ज्याने इस्लामला जगभरातील काफिरांचे प्रमाण कमी करायचे आहे. मुस्लिमांना केवळ पैसा, गुलाम आणि लैंगिक गुलाम पुरवण्यापुरतेच काफिरांचे अस्तित्व आहे. दहशतवाद माणसाच्या अवचेतन मनावर हल्ला करतो, हे इस्लामला समजले आहे. आपण माणूस आहोत याची जाणीवही दहशतीने ग्रासलेल्या या लोकांना नाही आणि म्हणूनच ते शरण जाऊन भार वाहणारे पशू बनतात. ते आधीपासूनच मुस्लिमांचे तुष्टीकरण करणे सुरू करतात कारण केवळ जिवंत राहणे हीच एकमेव गोष्ट त्यांच्या डोक्यात असते. ते सातत्याने इस्लामची स्तुती करतात आणि त्यामुळे सहकारी काफिरांसोबत असलेले त्यांचे सामाजिक संबंध दुरावतात. ते अविश्वसनीय आणि धूर्त बनतात आणि त्यांच्यात लज्जा, अपराधीपणाची भावना देखील राहात नाही. म्हणूनच काफिरांच्या हृदयात दहशत निर्माण करणे हे इस्लामी अनुयायांचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ विश्लेषक माजिद खद्दुरी यांच्या म्हणण्यानुसार, ‘आस्तिकांवर मनोवैज्ञानिकदृष्ट्या तसेच युद्धाच्या माध्यमातून आणि राजकीय स्वरूपात इस्लामची सार्वत्रिकता लादली जाते. त्याचप्रमाणे, जिहादला कायमस्वरूपी युद्धाचे तत्त्व म्हणून संबोधले जाऊ शकते, सतत लढण्याचे स्वरूप म्हणून नाही.’ तसेच नियमित दहशतवादी हल्ले आणि मनोवैज्ञानिक युद्धाद्वारे इस्लाम दहशतीची ही स्थिती प्राप्त करेल. यासाठी जिहादी व कट्टरवादी इस्लामी अनुयायी हत्या, बलात्कार आणि लूटपाट सुरूच ठेवतील आणि त्याचवेळी काफिर काहीच प्रतिक्रिया देणार नाहीत, हे सुनिश्चित करण्यासाठी आपण ‘पीडित’ असल्याची त्यांची ओरडही सुरूच राहील, असेही माजिद खद्दुरी यांचे म्हणणे आहे.
 
 
इब्न अल-मुनीर (मृत्यू 1333) याने लिहिले आहे, ‘युद्ध ही फसवणूक आहे, म्हणजेच धार्मिक, आस्तिक योद्ध्याने सुरू केलेले सर्वात पूर्ण आणि परिपूर्ण युद्ध हे फसवणुकीचे युद्ध आहे, संघर्षाचे नाही, कारण नंतरच्या अंतर्निहित धोक्यांमुळे, आणि कोणत्याही व्यक्तीला (स्वत:ला) इजा न करता विश्वासघाताने विजय मिळवता येतो. इब्न हजर (मृत्यू 1448) याने मुस्लिमांना युद्धात अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. तसेच काफिरांना धोका देण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात विलाप आणि शोक करावा, असा सल्लाही इब्न हजरने दिला आहे.
 
 
हे लंडन आहे!
Religious fanaticism : दक्षिण-पूर्व लंडनमध्ये 27 मार्च 2024 रोजी धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याच्या घटनेमुळे इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन चांगलाच संतापला आहे. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत ‘लंडनमध्ये हा काय मूर्खपणा चालला आहे? लंडन हे एकेकाळी सर्वात शांत, सुंदर शहर होते. आता मात्र हे शहर म्हणजे जणू कलंक ठरले आहे. तुम्ही स्वस्त-महाग असे कोणत्याही प्रकारचे घड्याळ घालू शकत नाही. तुम्ही स्वत:चा फोन हातात घेऊन फिरू शकत नाही. महिलांच्या पर्सेस व दागिने हिसकावले जातात. चोरीसाठी गाड्यांची तोडफोड केली जाते. चाकूने मारामारी होत असल्याचे व्हिडीओ नेहमी दिसतात. सादिक खान, तुम्ही जे निर्माण केले आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे? सादिक खान हे ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टीचे नेते आणि 2016 पासून लंडनचे महापौर आहेत. त्यांच्या कार्यकाळात मुस्लिम उन्मादासोबत गुन्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
 
 
माध्यमांची भूमिका
पाश्चिमात्य देशांमधील लिबरल (उदारमतवादी) लोक प्रत्येक दहशतवादी हल्ल्यासाठी पाश्चिमात्य देशांनाच दोषी ठरवतील. ते प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लामी अनुयायांना अधिक सवलती देण्याची मागणी करतील. अशाप्रकारे, पाश्चिमात्य देश शरण जात राहतील आणि इस्लामी अनुयायी अर्थात हे मुस्लिम त्यांना अनुकूल असलेल्या राजकारण्यांना लाच देतील आणि जे याला विरोध करतील त्यांना कलंकित करून, त्यांना नोकरीवरून काढून टाकून पूर्णपणे संपवून टाकतील. यातील विरोधाभास असा की काफिर राजकारण्यांना इस्लाम जी लाच देतो त्यासाठी लागणारा पैसा देखील ‘काफिर’ लोकांकडूनच पुरवला जातो. ज्या राजकारण्यांना हे इस्लामी अनुयायी लाच देतात ते इस्लामिक तहजीब केंद्र, मदरसे आणि मुस्लिम स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांसारख्या आपल्या संस्थांना कराचा पैसा अनुदान म्हणून देतात.
 
 
इस्लामने पाश्चिमात्य देशांत आधीच द्विस्तरीय पोलिस व्यवस्था साधली आहे. शेवटी परिस्थिती अशी होईल की ‘काफिरां’जवळ मुसलमानांच्या पाळीव प्राण्यांपेक्षा देखील कमी अधिकार असतील. उदाहरणार्थ, पाकिस्तानात जर एखाद्या मुस्लिमाने त्याच्या शेजारच्या मुस्लिमाची म्हैस चोरली तर पोलिस येतात, तपास करतात आणि त्याच्यावर म्हैस परत करण्यासाठी दबाव आणतात. पण जर त्याच मुस्लिमाने आपल्या हिंदू शेजार्‍याच्या दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिने इस्लामचा स्वीकार केल्याचे घोषित केले आणि तिच्याशी निकाह लावला तर कोणतेही पोलिस, कोणतेही न्यायालय आणि कोणतेही सरकार अपहृत मुलीला त्या हिंदू शेजार्‍याच्या सुपूर्द करू शकणार नाही.
 
 
Religious fanaticism : भारतात देखील आपण पाहतो की जे चांगले शासन करतात, उत्तम राज्यकारभार चालवतात अशा राजकारण्यांना मुसलमान मतदान करीत नाहीत तर जे द्विस्तरीय पोलिस यंत्रणेला परवानगी देतात अशा (तुष्टीकरणवादी) राजकारण्यांनाच भारतातील मुसलमान मतदान करतात. आणि द्विस्तरीय पोलिसिंग म्हणजे शरियतशिवाय दुसरे काहीही नाही. कारण शरियतमध्ये मुसलमान आणि काफिरांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लिबरल वर्ग इस्लामच्या सेवेत वर्तमानाला खोटे ठरवण्यासारख्या साधनांद्वारे इस्लामला मदत करीत आहेत.
 
 
लोकांना इस्लामच्या वास्तविकतेची, खर्‍या स्वरूपाची ओळख करून देणारी कोणतीही बातमी मीडियाद्वारे प्रकाशित किंवा प्रसारित केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. जगात कुठेही मुस्लिमांबाबत घडणार्‍या कोणत्याही प्रतिकूल घटनेविषयी अतिशयोक्तीपूर्ण वार्तांकन केले जाते. मुस्लिमांसंदर्भातील प्रतिकूल बातम्या अनेक दिवस चर्चेत ठेवल्या जातात. बर्‍याचदा त्या अतिरंजित व अवास्तव असतात. अशा प्रकारे, एक छद्म वास्तव निर्माण होते. याचा परिणाम असा होतो की मुस्लिमांचा ‘सर्वत्र छळ’ होत असल्याचा निष्कर्ष सरासरी नागरिक काढतात. म्हणून जेव्हा ते मुसलमानांना पाश्चिमात्य देशातील शहरातील रस्त्यांवर ‘काफिरांना’ मारताना पाहतात तेव्हा ते त्यांना माफ करतात.
 
 
मुस्लिम-दलित युती
जोपर्यंत ‘काफिर’ संपूर्णपणे नियंत्रणात येत नाहीत तोपर्यंत ते झोपून राहिले पाहिजेत (अखेरपर्यंत बेसावध राहिले पाहिजेत) असा सर्वतोपरी प्रयत्न) इस्लाम करतो. त्यामुळेच इंटरनेटवर कुराणाचे जे अनुवाद (भाषांतर) आहेत त्यातील जे भाग इस्लामला अनुकूल नाहीत ते इंटरनेटवरून काढून टाकले जात आहेत. कोणत्याही देशातील कोणत्याही उपेक्षित गटाला त्यांच्या मागे लपण्यासाठी, ‘काफिरां’ तील पीडित वर्गासाठी लढण्याचे नाटक करण्यासाठी त्यांना मित्र-सहयोगी बनवले जाते, जेणेकरून संपूर्ण इस्लामी दहशतवादाला या लिबरल मंडळींकडून ‘सेक्युलॅरिझम’चा टॅग मिळू शकेल.
 
 
उदाहरणार्थ, भारतातील दलितांकडे मित्र-सहकारी म्हणून पाहिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘पाकिस्तान अ‍ॅण्ड पार्टिशन ऑफ इंडिया’ (1945 मध्ये लिहिलेले पुस्तक, अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध) या पुस्तकात इस्लामबद्दल जे सत्य लिहिले आहे ते कोणत्याही ‘काफिर’ नेत्याने लिहिलेले नाही, एवढेच नव्हे तर चर्चिलनेही लिहिलेले नाही. डॉ. आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे की मुसलमानांसोबत सह-अस्तित्व अशक्य आहे आणि भारताच्या फाळणीच्या वेळी एकूण लोकसंख्येची अदलाबदल झाली पाहिजे. म्हणजेच भारताच्या फाळणीनंतर कोणत्याही मुस्लिमाला भारतात राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये. मात्र, असे असूनही, भारतातील सर्व मुस्लिम रॅलींमध्ये डॉ. आंबेडकरांचे पोस्टर्स ठळकपणे प्रदर्शित केले जातात, कारण मुसलमानानांना आपले सहकारी म्हणून दलित हवे आहेत.
 
 
Religious fanaticism : लोक अनेकदा यावर काय उपाय योजता येतील असे विचारतात. यावर बिगर-राजकीय सामाजिक संस्थांना बळकटी देणे हा उपाय आहे. अशा गैरराजकीय सामाजिक संस्था राजकारणी आणि सरकारवर लक्ष ठेवू शकतात. पाश्चात्त्य समाजांनी राजकारणी आणि राजकीय पक्षांवर सर्वकाही सोपवून मोठीच चूक केली. कारण ‘निवडणुकीत विजय प्राप्त करणे आणि कुठल्याही परिस्थितीत सत्ता टिकवणे’ ही एकच गोष्ट राजकारण्यांना माहीत असते. ते ज्या लोकांवर राज्य करतात त्यांच्याबद्दल त्यांना कुठलीही सहानुभूती नाही. सत्ता प्राप्त करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी राजकारणी कुठलीही पातळी गाठू शकतात आणि देशाला घाऊक भावात विकूनही टाकू शकतात.
 
 
Religious fanaticism : पाश्चिमात्य देशांना सामाजिक संस्था-संघटनांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. ज्या संघटनांचे, संस्थांचे राजकीय क्षेत्रात उतरण्याचे किंवा सत्ता प्राप्त करण्याचे कोेणतेही ध्येय नाही, अशा संस्थांना जवळ करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या संस्था-संघटना संस्था लोकांमध्ये चारित्र्य विकसित करण्याचे काम करतात, सर्वत्र अन्यायाविरुद्ध लढा देतात, सत्ताधारी वर्गावर लक्ष ठेवतात (राजकारणी, नोकरशाही, मीडिया, शिक्षणतज्ज्ञ, न्यायव्यवस्था) आणि ज्यांचा राजकीय क्षेत्रात उतरण्याचा कोणताही हेतू नाही, ज्यांना सत्तेची कोणतीही लालसा नाही, अशा लोकांकडून त्या चालवल्या जातात. हे सर्व धिम्मी स्थापन होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे, कारण त्यानंतर काफिरांना संघटित करणे अशक्य होऊन बसेल.
(लेखक इंग्लंड येथील विचारवंत आहेत)
(पांचजन्यवरून साभार)